प्रादेशिक बातम्या

January 16, 2025 7:24 PM January 16, 2025 7:24 PM

views 12

शेत रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीत मोठ्या वाहनांचा वापर होतो, त्यामुळे वाहन प्रकारानुसार शेत रस्ता बनवण्याबाबत तहसीलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. ...

January 16, 2025 8:02 PM January 16, 2025 8:02 PM

views 3

गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.  शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देतांना जवळपास ६० टक्के पाणी गळतीचे प्रमाण दिसून येत असून गळतीचं प्रमाण ६० टक्यांवरून २० टक्यांवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि जलसंपदा विभागानं...

January 16, 2025 6:53 PM January 16, 2025 6:53 PM

views 2

राज्यातल्या ६ जिल्हापरिषदा आणि ४४ पंचायती समित्यांवर ‘प्रशासक राज’

मुदत संपल्यानं राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत  येणाऱ्या एकूण ४४ पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर यांचा समावेश आहे. या सहा जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्...

January 16, 2025 7:56 PM January 16, 2025 7:56 PM

views 12

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   सिडबी-स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्ट अपसाठी २०० कोटी रुपये तर प्रत्येक प्रादेशिक  विभागाला ३० क...

January 16, 2025 7:56 PM January 16, 2025 7:56 PM

views 5

संजय शिरसाठ यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी

राज्य सरकारनं संजय शिरसाठ यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन दूर केलं आहे. त्यांची मंत्रीपदावर नियुक्ती झाल्यानं त्यांच्याकडचा हा पदभार काढून घेतल्याचं सरकारनं शासन निर्णयात म्हटलं आहे.

January 16, 2025 8:25 PM January 16, 2025 8:25 PM

views 14

सैफ अली खानची प्रकृती स्थिर, आरोपीच्या शोधासाठी १० पथकांची स्थापना

अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. त्यात त्याला ६ ठिकाणी जखमा झाल्या होत्...

January 16, 2025 3:50 PM January 16, 2025 3:50 PM

views 13

भंडारा जिल्ह्यातील तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

भंडारा जिल्हा ग्रामीण आरोग्य सेवेच्या येरली, वडद आणि लाखोरी या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने या पुरस्कारांसाठी प्रमाणपत्र जाहीर केलं आहे. भारतातल्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये, आरोग्य सुविधा आणि संसर्ग नियं...

January 16, 2025 3:45 PM January 16, 2025 3:45 PM

views 9

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘...

January 16, 2025 7:54 PM January 16, 2025 7:54 PM

views 2

धरणांमधल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेनं वापर करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

धरणातल्या पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वापर करावा अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंत्रालयात ते बोलत होते. सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी अडथळा येऊ नये असे नियोजन जलसंपदा विभागाने करणे आव...

January 16, 2025 3:37 PM January 16, 2025 3:37 PM

views 5

गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा – राजेंद्र सिंह

जलप्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीचं आरोग्य बिघडलं असून, गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा, असं आवाहन, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केलं आहे. नाशिक मध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित, गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे भवितव्य गोदा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.