June 24, 2025 5:50 PM
7
ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं-प्रधानमंत्री
ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केरळमधील समाजसुधारक श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. दहशतवाद्यांची आश्रयस्थानं आता सुरक्षित नाहीत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. आजच्या भारतात केवळ राष्ट्रहिताचे निर्णय घेतले जातात तसंच भारताचं इतर देशांवरचं लष्करी अवलंबित्व कमी होत आहे, देश संरक्षणदृष्ट्या स्वावलंबी होत आहे, हे प्रधानमं...