May 8, 2025 7:56 PM

views 38

मुंबईत बेस्ट बसच्या प्रवासभाड्यात वाढ !

मुंबईत बेस्ट उपक्रमावरचं आर्थिक संकट दूर करण्यासाठी बेस्ट बसच्या किमान प्रवासभाड्यात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. साध्या बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १० रुपये, तर वातानुकूलित बसकरता पहिल्या पाच किलोमीटरसाठी १२ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे. १० किलोमीटरसाठी १० ऐवजी १५ रुपये, १५ किलोमीटरसाठी १५ ऐवजी २० रुपये, २० किलोमीटरसाठी २० ऐवजी ३०, २५ किलोमीटरसाठी २० ऐवजी ३५, तर पुढं प्रत्येक ५ किलोमीटरसाठी ५ रुपये वाठीव प्वासभाडं द्यावं लागणार आहे.    मासिक पास ९०० रुपया...

April 22, 2025 6:54 PM

views 39

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.   भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

April 13, 2025 8:06 PM

views 33

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतल्या टँकर चालकांचा संप सुरुच असल्यानं, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं २००५ चा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करायचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केल्या जाणार आहेत. व्यापक जनहितासाठी हा निर्णय घेतल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. या निर्णयामुळे आता खासगी गृहनिर्माण संस्था आणि इतरांना टँकरद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा करणं शक्य होईल असं पालिकेनं म्हटलं आहे....

April 11, 2025 8:42 PM

views 25

मुंबईकरांना एकाच कार्डवरुन सर्व प्रवासी सुविधांचं तिकिट लवकरच काढता येणार

मुंबईतल्या बेस्ट, उपनगरीय रेल्वे, मेट्रो इत्यादी सर्व प्रवासी सेवांचं एकाच माध्यमातून तिकिट देणारं मुंबई वन कार्ड लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत वार्ताहर परिषदेत म्हणाले.   याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध इतिहास, तसंच राज्यातल्या इतर सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांचं दर्शन घडवणारी भारत गौरव रेल्वेगाडी येत्या १६ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी आज दिली. यंदाच्या अर्थसंकल्प...

April 9, 2025 8:43 PM

views 31

मुंबईकर सावधान ! पावसाळ्यात धोक्याची घंटा

यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्राला मोठी भरती येणार आहे, त्यामुळे मुंबईसाठी यंदाच्या पावसाळ्यातले १८ दिवस धोक्याचे आहेत, असा इशारा महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिला आहे.  या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. या दिवसांत पर्यटकांनी किनाऱ्यावर जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

April 1, 2025 2:36 PM

views 36

मुंबईत वेव्हज् परिषदे दरम्यान वेव्हज् बाजाराचही आयोजन

मुंबईत होणाऱ्या वेव्हज् परिषदेच्या दरम्यान वेव्हज् बाजारचंही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागीदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार - विक्रेते यांच्यातल्या बैठकांकरता जागा, आंतर-देशीय भागीदारी यासाठी सुविधा उपलब्ध असेल. www.wavesbazaar.com या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे.

March 31, 2025 9:00 PM

views 39

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात 13 अंशपर्यंत तफावत

मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात १३ अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून आल्याचं रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेसनं जारी केलेल्या विश्लेषणात नमूद केलं आहे. १ ते २२ मार्च या कालावधीत वसई पूर्व आणि घाटकोपरमधे सरासरी ३३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तर याच काळात पवईमधे सरासरी २०  अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होतं. हा फरक १३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यावर स्थानिक बाबी विचारात घेऊन उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा या विश्लेषणात व्यक्त केली आहे. तापमानातला हा फर...

March 28, 2025 9:12 PM

views 48

सावधान ! उघड्यावर कचरा जाळल्यास बसणार दंड

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना यापुढं  १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतका दंड आकारला जाणार असल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषण तसंच पर्यावरण विषयक गंभीर धोके निर्माण होत असल्याची जाणीव करून देण्यासाठी महानगरपालिकेनं दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे. 

March 17, 2025 8:17 PM

views 25

Torres scam: मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचं विशेष एमपीआयडी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल

टोरेस पाँझी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आज विशेष एमपीआयडी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणी आत्तापर्यंत सात जणांना अटक झाली आहे, तर १००पेक्षा जास्त जवाब नोंदवून घेतले आहेत. आरोपींवर विविध कलमांतर्गत खटला दाखल केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

March 15, 2025 2:56 PM

views 51

मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक

मुंबईत सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक  केली असून त्यांच्याकडून तस्करीचं साडेतीन कोटीपेक्षा जास्त किंमतीचंसोनं जप्त केलं आहे.   सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री संशयावरून एकाला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता सोन्याची भुकटी असलेली पाकिटं त्याच्याकडे सापडली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याकडून सोनं जप्त केलं.