May 14, 2025 7:42 PM

views 24

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची काँग्रेसची मागणी

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. बी बियाणं उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे, मात्र सरकार त्यासाठी काहीच करत नाही असं सपकाळ म्हणाले. राज्यभर बोगस बियाणांचा सुळसुळाट झाला आहे, त्याचा बंदोबस्त सरकारने करावा अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवणं हे अत्यंत चुकीचं आहे, असंही सपकाळ म्हणाले. 

May 14, 2025 6:56 PM

views 16

ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्याशी राज्याचा करार

राज्य सरकारने आज ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्याशी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार  केला. या करारानुसार राज्यात दहाहून अधिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार आहेत. यासाठी नागपूर, मुंबई, चाकण, खंडवा, सिन्नर, पनवेल याठिकाणी ७९४ एकरपेक्षा जास्त जमीन अधिगृहित केली जाईल. या सर्व प्रकल्पांमधे ५ हजार १२७ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक केली जाणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे २७ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.    हा क...

May 13, 2025 7:29 PM

views 42

कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नैसर्गिक वाळूच्या अतिउपशामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसंच बांधकाम क्षेत्राला पर्यायी आणि टिकाऊ साधन उपलब्ध व्हावं यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचं उत्पादन आणि वापर धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती किंवा संस्थांना कृत्रिम वाळू युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे. तसंच या युनिट्सना २०० रुपये प्रति ब्रास इतकी सवल...

May 13, 2025 3:36 PM

views 12

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात जाहीर केला. राज्याच्या नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४६ हजार ५७९ नियमित विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ जण उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा यंदाच्या निकालात १ पूर्णांक ७१ शतांश टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी ९...

May 13, 2025 9:35 AM

views 18

दहावीचा निकाल आज जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल, आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे, असं मंडळाच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील.

May 13, 2025 3:09 PM

views 9

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र ८९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ८९ पदकांसह पदकतालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेचा आजचा दहावा दिवस असून आज झालेल्या जिमनॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना हिने सुवर्णपदक जिंकलं आहे. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या देवांगी पवार हिने कांस्य पदकाची कमाई केली आहे. बॉल जिमनॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या किमया कारळे हिने सुवर्ण पदक ...

May 12, 2025 8:36 PM

views 11

Khelo India : महाराष्ट्र ८४ पदकांसह पदकतालिकेत अग्रस्थानी

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ८४ पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदकतालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३३ सुवर्ण आणि २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक ४४ पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान २७ पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.    खेलो इंडियाचा आज नववा दिवस असून आज दिवसभरात मुष्टियुद्ध, टेनिस आदी खेळांचे सामने झाले. तसंच नव्याने समाविष्ट झालेले कलारीपायत्तू आणि थांग खेळही खेळले गेले.    फूटबॉलम...

May 12, 2025 6:57 PM

views 21

राज्यात अवकाळी पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे, पाेलिसांसाठी नव्यानं बांधलेल्या इमातीतल्या घरांच्या खिडक्या निखळल्या. जालना शहरासह जिल्ह्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही आज दुपारच्या सुमाराला अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.     नाशिक शहराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं तर मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडल्यानं वीज पुरवठाही काही काळ खंडीत झाला. अवका...

May 11, 2025 8:29 PM

views 16

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रची ७५ पदकांची कमाई

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७५ पदकांची कमाई केली आहे. यात २८ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कास्य पदकांचा समावेश आहे. त्यातही सर्वाधिक २९ पदकं पोहण्याच्या स्पर्धेत मिळाली असून त्यात ७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. त्याखालोखाल तिरंदाजी, नेमबाजी, सायकलिंक, भारोत्तोलन, मल्लखांब, टेबलटेनिस आणि खो-खो या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्राखालोखाल १४ सुवर्ण पदकांसह ३९ पदकं मिळवून कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान २३ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.   खेलो इंडिया स्...

May 11, 2025 7:31 PM

views 7

११वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार

राज्यात यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने होणार आहे. येत्या ११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली.   प्रवेश प्रक्रियेदरम्यान पालक किंवा विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारने mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ आणि ८५३०९५५५६४ हा मदत दूरध्वनी क्रमांक दिला आहे.