May 5, 2025 7:11 PM May 5, 2025 7:11 PM

views 14

अहिल्यानगरमधल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचं औचित्य साधून ही बैठक चौंडी इथं आयोजित केल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या बैठकीत जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निर्णय होतील असंही ते म्हणाले.    भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीचं भूमीपूजन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे.  तसंच अहिल्यानगर शहरातल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमं...

May 5, 2025 3:58 PM May 5, 2025 3:58 PM

views 16

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ‘टेक वारी’ उपक्रम

राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल, गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. टेक वारी - महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तेव्हा ते बोलत होते. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी हा प्रशिक्षण आठवडा आजपासून येत्या ९ मे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.   टेक व...

May 5, 2025 3:58 PM May 5, 2025 3:58 PM

views 16

बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर  झाला. परीक्षेचा एकूण निकाल ९१ पूर्णांक ८८ शतांश टक्के इतका लागला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात बोर्डाची परीक्षा घेण्यात आली.    कोकण विभागाचा निकाल ९६ पूर्णांक ७४ शतांश टक्के लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वल स्थानी आला आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ९३ शता...

May 1, 2025 7:04 PM May 1, 2025 7:04 PM

views 6

राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या १०० दिवसांचं मूल्यमापन जाहीर

राज्यात शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं मूल्यमापन आज जाहीर झालं. कार्यक्षम संकेतस्थळ, कार्यालयीन तसंच तक्रार निवारण सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर अशा दहा मुद्द्यांवर  भारतीय गुणवत्ता परिषदेनं केलेल्या या मूल्यमापनानुसार ४८ विभागांपैकी १२ विभागांनी १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त केलं आहे.    या शंभर दिवसांच्या मूल्यमापनात महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला आहे तर त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आणि परिवहन आणि बंदरे विभाग हे मंत्रालय...

April 30, 2025 7:28 PM April 30, 2025 7:28 PM

views 16

पीक वीमा योजनेत केलेला बदल चुकीचा असल्याची काँग्रेसची टीका

राज्य सरकारनं पीक वीमा योजनेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला बदल चुकीचा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं बातमीदारांशी बोलत होते.  हा बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. म्हणून तो रद्द करावा, आणि आतापर्यंत सुरु असलेली योजनाच पुन्हा लागू करावी, अन्यथा शेतकरी, आणि काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.    नैसर्गिक आपत्ती हंगामातली प्रतिकूल परिस्थिती, आणि काढणी पश्चात झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळत हो...

April 27, 2025 1:35 PM April 27, 2025 1:35 PM

views 13

पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

April 24, 2025 3:06 PM April 24, 2025 3:06 PM

views 9

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक तसंच मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डोंबिवली शहरात आज या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला आहे. बीड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणारा भीमसंगीताचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. लातूर शहरात मुस्लीम समाजाने मेणबत्त्या पेटवून हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. धुळे शहरातही विविध संघटनांनी आज जिल्...

April 24, 2025 3:09 PM April 24, 2025 3:09 PM

views 9

जम्मूकश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत परतली

जम्मू कश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज  पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप पोहचली. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.    काश्मिरमधे अडकलेल्या राज्याच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचं एक विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. इंडिगो एअरलाईन्सचं एक विमान 83 पर्यटकांना परत आणेल. ही दोन्ही विमानं सायंकाळी सुमारास मुंबई...

April 23, 2025 1:48 PM April 23, 2025 1:48 PM

views 14

हलगाम हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर १६ जण जखमी

काश्मीरमधे पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वत्र तीव्र निषेधाची लाट उमटली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २७ जणांचा बळी गेला असून त्यातले बहुसंख्य पर्यटक होते. महाराष्ट्रातल्या ६ पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि गंभीर रीत्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातले आणखी किती पर्यटक तिथं होते याचा शोध राज्यसरकार घेत आहे. पहलगाम ...

April 16, 2025 9:34 AM April 16, 2025 9:34 AM

views 8

महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मुंबईत सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत...