डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर  झाला. परीक्षेचा एकूण निकाल ९१ पूर्णांक ८८ शतांश टक्के इतका लागला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. 

 

कोकण विभागाचा निकाल ९६ पूर्णांक ७४ शतांश टक्के लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वल स्थानी आला आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ९३ शतांश टक्के लागला आहे, पुणे ९१ पूर्णांक ३२ शतांश टक्के, नागपूर ९० पूर्णांक ५२ शतांश टक्के, छत्रपती संभाजीनगर ९२ पूर्णांक २४ शतांश टक्के, कोल्हापूर ९३ पूर्णांक ६४ शतांश टक्के, अमरावती ९१ पूर्णांक ४३ शतांश टक्के, नाशिक ९१ पूर्णांक ३१ शतांश टक्के, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८९ पूर्णांक ४६ शतांश टक्के इतका लागला आहे. राज्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यार्थ्यांना उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती, मंडळांनं दिली आहे. 

 

विज्ञान शाखेचा निकाल ९७ पूर्णांक ३५ शतांश टक्के, कला शाखेचा ८० पूर्णांक ५२ शतांश टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ९२ पूर्णांक ६८ शतांश टक्के इतका लागला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा