February 2, 2025 8:12 PM February 2, 2025 8:12 PM

views 16

आदिवासीबहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट २०२५ या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते.   सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं जीडीपीमधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य दिलं आहे, आदिवासीबहुल भागाच्या सर्वसमा...

February 2, 2025 7:45 PM February 2, 2025 7:45 PM

views 12

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महानुभाव पंथाच्या राज्यातल्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करायचा संकल्प सरकारनं केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात ते आज बोलत होते. चक्रधऱ स्वामी आणि त्यांच्या अनुयायांनी विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचं कार्य केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं महानुभाव पंथाच्या अनेक मंदिराचा विकास केला आहे, तसंच रिद्धपूर पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान या ठिकाणीही संवर्धनाच...

January 30, 2025 5:23 PM January 30, 2025 5:23 PM

views 6

नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही अभिमानाची गोष्ट – मुख्यमंत्री

नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.    ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली इथल्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच देशाच्या राजधानीत हे भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या. 

January 27, 2025 6:50 PM January 27, 2025 6:50 PM

views 11

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज २१ मोबाइल फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण केलं. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि साठवण्याची व्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना सांगितलं. सबळ पुरावे नसल्यानं किंवा पुराव्यांसोबत छेडछाड झाल्यामुळे गुन्हेगार सुटण्याचं प्रमाण या वाहनांमुळे कमी होईल, असं ते म्हणाले.    राज्यात अशी एकूण २५६ फॉरेन्सिक वाहनं तयार केली जाणार आहेत. भारतीय साक्ष कायद्यानुसार गुन्ह्यातल्या पुराव्यांसाठी शा...

January 14, 2025 9:00 PM January 14, 2025 9:00 PM

views 14

पानिपतच्या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल-मुख्यमंत्री

पानिपतच्या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. ते आज पानिपत युध्दाला २६४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पानिपत इथं आयोजित मराठा शौर्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.    या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्यानं त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, तसंच या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणाही फडनवीस यांनी केली.

January 13, 2025 8:41 PM January 13, 2025 8:41 PM

views 17

शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन तत्परतेने सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागानं करायच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. राज्यातल्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी ही दर्जेदार आणि गतीनं करा, राज्यातल्या महामार्गांची उभारणी, तसंच रस्त्यांचं जाळं दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्ट...

January 13, 2025 8:37 PM January 13, 2025 8:37 PM

views 15

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृध्दी महामार्गालगत ऍग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवा असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.    नवी मुंबईत शेतमालासाठी महा बाजार उभारण्याचं नियोजन आहे. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेत हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचं अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितले. राज...

January 2, 2025 3:55 PM January 2, 2025 3:55 PM

views 19

नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. यामुळे या भागातल्या जीवन सुलभतेला चालना मिळेल, आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असं त्यांनी समाजमाध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. गडचिरोली इथं काल ११ नक्षली अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी गडचिरोलीतल्या नागरिकांचं विशेष अभिनंदन केलं आहे.

January 2, 2025 10:04 AM January 2, 2025 10:04 AM

views 8

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनाण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले. ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा...

January 2, 2025 9:55 AM January 2, 2025 9:55 AM

views 14

गडचिरोलीत 11 नक्षली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शरण

गडचिरोली इथं विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षल्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली. तारक्का मागील 38 वर्षांपासून नक्षल चळवळीत होती. संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही हे नक्षल्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. फडणवीस यांनी भामरागड तालुक्यातील पेनगुं...