प्रादेशिक बातम्या

October 26, 2025 8:53 AM October 26, 2025 8:53 AM

views 15

पशुधनाच्या नुकसानापोटी मिळणाऱ्या भरपाईच्या निकषांत बदल

विविध कारणांनी पशुधनाच्या नुकसानापोटी मिळणाऱ्या भरपाईचे निकष आता बदलण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रत्येक जनावराच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना मिळणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार केवळ तीन जनावरांसाठी मदत दिली जात होती. राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीनं शेतीबरोबरच 28 जिल्ह्यांमध्ये पशुधनाचं मो...

October 26, 2025 8:41 AM October 26, 2025 8:41 AM

views 120

रिध्दपूर इथं जागतिक कीर्तीचं मराठी भाषा विद्यापीठ उभारणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

'सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्याबरोबर समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची आहे', असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38 व्या अधिवेशनात ते काल बोलत होते...

October 25, 2025 8:36 PM October 25, 2025 8:36 PM

views 34

पादत्राणे उद्योगासाठी जीएसटीचे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना लाभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटी दर सुधारणांमुळे गेल्या २२ सप्टेंबर पासून देशभरात बचत उत्सव सुरु झाला आहे. पादत्राणे उद्योगासाठी जीएसटी चे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. याबद्दल आमच्या प्रतिनिधीनं माहिती दिली.     (जीएसटीच्...

October 25, 2025 8:28 PM October 25, 2025 8:28 PM

views 16

भारत देश येत्या दोन वर्षात मोबाईल फोनच्या सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल-वैष्णव

भारत देश येत्या दोन वर्षात मोबाईल फोनच्या  सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत  होते.    सर्व्हरसह उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणकांसा...

October 25, 2025 8:20 PM October 25, 2025 8:20 PM

views 21

मुंबईचा AQI हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला

मुंबईचा AQI अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला आहे. दिवाळीत हा निर्देशांक झपाट्याने खालावला होता. दोन दिवस काही ठिकाणी पडलेल्या तुरळक पावसाने धुरके खाली बसून निर्देशांकात सुधार व्हायला मदत झाली.  बहुतांशी ठिकाणी हा निर्देशांक मध्यम श्रेणीत पोचला.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपा...

October 25, 2025 8:10 PM October 25, 2025 8:10 PM

views 150

ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं आज दुपारी अडीच वाजता मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.  त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज दुपारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.    १९७२ मधे पुण्याच्या  चित्रपट...

October 25, 2025 8:09 PM October 25, 2025 8:09 PM

views 145

AI चा वापर करणारा सिंधुदुर्ग देशातला पहिला जिल्हा

प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी  नीती आयोगाचं एक पथक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निती आयोगाचं पथक या दौऱ्यात...

October 25, 2025 8:06 PM October 25, 2025 8:06 PM

views 21

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची  विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची-मुख्यमंत्री

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची  विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची असून सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच त्यांनी समाजात समतेचा विचार रुजवला, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नाशिक इथं आज  अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या  अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत...

October 25, 2025 3:20 PM October 25, 2025 3:20 PM

views 89

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ...

November 3, 2025 9:24 AM November 3, 2025 9:24 AM

views 38

प्रधानमंत्र्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘Modi’s Mission’ या पुस्तकाचं प्रकाशन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित Modi’s Mission या पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं. प्रख्यात वकील बर्जिस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.