राष्ट्रीय

June 27, 2025 4:14 PM

views 21

भविष्यातला माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज आहे – मंत्री नितीन गडकरी

भविष्यातला माणूस घडविण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट्य निश्चित करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात मंथनच्या वतीनं आयोजित शिक्षक परिसंवादात बोलत होते. जगात समाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाण...

June 27, 2025 4:12 PM

views 16

भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारताचा कायम भर – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायम भर दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यांच्या SCO च्या बै...

June 27, 2025 3:54 PM

views 25

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय MSME दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. MSME क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या...

June 27, 2025 3:52 PM

views 68

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळण्यासाठी पुणे इथं कापूस, हळद आणि मका पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पुणे इथं कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्...

June 27, 2025 3:45 PM

views 5

२०२६ च्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा, राज्यात ऊसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढणार

सन २०२६च्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन १५ टक्क्यानं वाढून साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे. जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात, ...

June 27, 2025 2:10 PM

views 6

कर्नाटकमधे चामराजनगर जिल्ह्यातल्या मलय महादेश्वर अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले

कर्नाटकमधे चामराजनगर जिल्ह्यातल्या मलय महादेश्वर अभयारण्यात एक वाघीण आणि तिचे चार बछडे मृतावस्थेत आढळले आहेत. वाघांना मारण्यासाठी आमिष म्हणून गायीच्या मृतदेहात विष मिसळण्यात आलं असावं, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्नाटक ५६० ...

June 27, 2025 2:06 PM

views 36

भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि चीन दरम्यान २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांत पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यां...

June 27, 2025 2:03 PM

views 21

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेला पुरी इथं सुरुवात

ओडिशामध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंडं बलभद्र आणि सुभद्रा या देवतांच्या रथयात्रेला आज सकाळी पुरी शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. त्यासाठी जगभरातील हजारो भक्त पुरीमध्ये जमले आहेत. ही रथयात्रा तिन्ही देवतांना श्री गुंदीचा मंदिराकडे नऊ दिवसांसाठी घेऊन जाते. यात्रेच्या वेळापत्रकानुसा...

June 27, 2025 1:59 PM

views 28

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यतेखाली बैठक पार

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या विविध कामगिरींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी...

June 27, 2025 1:57 PM

views 34

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिक मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं. आतापर्यंत १९ विशेष उड्डाणांद्वारे एकूण ४ हजार ४१५ भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.