November 17, 2025 9:27 AM November 17, 2025 9:27 AM

views 19

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं मत

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन,  प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यावेळी उपस्थित होत्या.   पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची वचनबद्धता हवी, तसंच सत्याचा शोध घेण्याचं धैर्य हवं असं रंजना प्रकाश देसाई यावेळी म्हणाल्या.

October 26, 2025 1:09 PM October 26, 2025 1:09 PM

views 6

नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त शौर्य रन २०२५ चं आयोजन

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्ली इथं ७९व्या शौर्य दिनानिमित्त आयोजित शौर्य रन २०२५ला हिरवा झेंडा दाखवला. लष्कराचे अधिकारी, जवान, धावपटू यांच्यासह १० हजारपेक्षा जास्त नागरिकांनी यात भाग घेतला आणि देशाच्या जवानांचं शौर्य, शिस्त आणि सर्वोच्च त्यागाला अभिवादन केलं.

October 14, 2025 1:23 PM October 14, 2025 1:23 PM

views 37

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष उख्ना यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून चर्चेनंतर काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे.    सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि लोकशाही मूल्यांमधील समानतेमुळे १९५५ पासून गेली ७० वर्ष भारत आणि मंगोलिया यांच्यात बहुस्तरीय घनिष्ठ भागीदारी प्रस्थापित झाली आहे. प्रथमच भारत भेटीवर आलेले मंगोलियाचे अध्यक्ष आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत.  ...

October 14, 2025 1:16 PM October 14, 2025 1:16 PM

views 27

जागतिक स्तरावरच्या संघटनांमधे सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण  मंत्र्यांचं प्रतिपादन

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं यजमानपद भारतीय लष्कराकडे आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संमेलनात बोलताना, कालबाह्य झालेल्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये सुधारणांची गरज असल्याची भारताची भूमिका अधोरेखित केली.   काही देश उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत, तर काही देशांना या नियमांवर आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. अशा परिस्थितीत नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम ...

August 27, 2025 6:30 PM August 27, 2025 6:30 PM

views 14

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं नवी दिल्लीत निधन

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९९२ च्या तुकडीतले गौर यांनी गंगटोक इथल्या आकाशवाणी केंद्रातल्या प्रादेशिक वृत्त विभागात सेवेला प्रारंभ केला होता.   सध्या ते नवी दिल्लीत वृत्त सेवा विभागात कार्यरत होते. पत्रसूचना कार्यालय आणि क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालयातही त्यांनी काम केलं होतं.

August 13, 2025 10:26 AM August 13, 2025 10:26 AM

views 4

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रिय मंत्री डॉ. एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव आणि पीयूष गोयल यामध्ये सहभागी होतील.   सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या सहकार्याला नवी दिशा देण्याचं या गोलमेज परिषदांचं उद्दीष्ट असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

May 20, 2025 1:05 PM May 20, 2025 1:05 PM

views 10

नवी दिल्लीत कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरू आणि संचालकांची वार्षिक बैठक

देशभरातल्या कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन संस्थेचे कुलगुरू आणि संचालकांची वार्षिक बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि २०४७ मधील विकसित भारत अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. परिषदेत कृषी क्षेत्रातले प्रमुख धोरणकर्ते, विचारवंत आणि शैक्षणिक तज्ञ एकत्र येतील आणि देशभरातील शेती क्षेत्रात नवसंकल्पना राबवून नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर चर्च...

April 23, 2025 8:14 PM April 23, 2025 8:14 PM

views 7

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचं पार्थिव मुंबईत आणि कौस्तुभ गणवते ...

April 23, 2025 6:24 PM April 23, 2025 6:24 PM

views 8

देशाचा वारसा आणि ऐतिहासिक स्मारकांचं जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू – सांस्कृतिक मंत्री

देशाचा वारसा आणि ऐतिहासिक स्मारकांचं जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग सातत्यपूर्ण प्रयत्न करतो आहे असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज  शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली पुरातत्त्व विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाची ३८ वी बैठक झाली.   या बैठकीनंतर त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला. आज झालेल्या बैठकीला विविध भागधारक उपस्थितीत होती. यापूर्वी साध्य केलेलं यश आणि भविष्यातील योजनांची आखणी यावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल...

April 10, 2025 1:32 PM April 10, 2025 1:32 PM

views 11

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु होत आहे. ४० देशातले दीडशेहून अधिक वक्ते या संमेलनात सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण ४० सत्रे होणार आहेत.   या वर्षीच्या संमेलनाचा विषय संभावना अर्थात शक्यता असा असून यामध्ये तांत्रिक आव्हाने आणि संधींवर चर्चा होणार आहे. या संमेलनात मुख्य भाषण, मंत्रीस्तरीय चर्चा, तज्ञ समितीस्तरीय आणि राजकीय स्तरावरील चर्चा होणार आहे.