June 29, 2025 8:45 PM June 29, 2025 8:45 PM

views 20

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ, ...

June 29, 2025 7:30 PM June 29, 2025 7:30 PM

views 35

त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं. विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आणि सरकारला एक पत्रही दिलं. मात्र विरोधकांकडे कोणतेही नवे मु...

June 27, 2025 7:03 PM June 27, 2025 7:03 PM

views 15

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे-मुख्यमंत्री

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जन प्रथा परंपरेनुसार व्हावं, यासाठी पर्यावरणाचा दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले आणि न्यायालयात टिकेल असं धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात बैठक झाली.

June 27, 2025 9:52 AM June 27, 2025 9:52 AM

views 15

शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

एक महामार्ग अर्थव्यवस्थेची अनेक दालनं उघडी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केलं आहे. शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महामार्गाच्या प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर पाचशे ते एक हजार शेततळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

June 13, 2025 8:24 PM June 13, 2025 8:24 PM

views 8

नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभा राहणार

नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभा राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मॅक्स एअरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कारखान्याचं प्रत्यक्ष काम २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये ८ हजार कोटींची ...

June 10, 2025 8:11 PM June 10, 2025 8:11 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम-मुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी सरकारने देशातला भ्रष्टाचार संपवत विकास आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे सरकार चालवलं असं मुख्यमंत्री म्हणाले.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एका वर्षात ३० लाख घरं देण्याचा विक्रम केला...

June 6, 2025 7:31 PM June 6, 2025 7:31 PM

views 20

एक कोटी रुपयांहून अधिक बक्षिस असलेल्या १२ नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत आत्मसमर्पण, शरण आलेल्या १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गडचिरोली पोलिस मुख्यालयात १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे १ कोटी १२ लाख रुपयांचे बक्षीस होतं. यावेळी आत्मसमर्पण केलेल्या १३ नक्षलवाद्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. नक्षलवादाच्या विरोधात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला असून, नक्षलवादाविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.  

June 3, 2025 7:39 PM June 3, 2025 7:39 PM

views 21

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य – मुख्यमंत्री

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण लाभार्थी मेळावा आज पुण्यामध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते. या घरांसाठी ८० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद केंद्र सरकारने केली असून राज्य सरकारतर्फे प्रत्येक लाभार्थ्याला ५० हजार रुपयांचं अनुदान देणार असल्याचं ते पुढे म्हणाले. यावेळी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री...

June 3, 2025 7:34 PM June 3, 2025 7:34 PM

views 21

अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत सरकार विचार करेल, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत सरकार विचार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. पावसामुळे सुक्या मासळीचं नुकसान झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. घराची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी मदतीकरीता तात्काळ निधी देण्याच्या म...

June 2, 2025 7:17 PM June 2, 2025 7:17 PM

views 14

विद्यापीठं नवोन्मेष आणि संशोधनाची केंद्र बनावीत, असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

विद्यापीठं केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था नाही तर संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रं बनावीत, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं. नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘चक्र’ या उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन आणि संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ‘चक्र' च्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या १५० दिवसां...