August 7, 2025 7:52 PM August 7, 2025 7:52 PM

views 9

अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मुंबईत उच्चस्तरीय बैठक

अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेतली.    अमेरिकेच्या शुल्कवाढ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर होणारे  संभाव्य परिणाम, तसंच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील उद्योगांचं हित आणि अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना...

August 4, 2025 8:23 PM August 4, 2025 8:23 PM

views 33

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७ मधल्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार – मुख्यमंत्री

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७मधल्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ च्या प्रभाग रचनेनुसार घ्याव्या अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असल्याने २०१७ मधल्या ओबीसी आरक्षणानुसार सर्व जिल्ह्यांमधे निवडणुका होतील, असं ते म्हणाले.   मुंबई महानगर क्षेत्रातल्या आणि इतर अशा ३३ पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा आढावा आजच्या व...

August 2, 2025 8:28 PM August 2, 2025 8:28 PM

views 15

विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुखचा सत्कार

ग्रँडमास्टर दिव्या देशमुखनं बुद्धिबळ या खेळातलं चीनचं वर्चस्व मोडीत काढलं याबद्दल एक भारतीय म्हणून तिचा अभिमान वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ विजेती दिव्या देशमुख हिचा आज नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते. तीन  कोटी रुपयांचा धनादेश, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळी चेस असोसिएशनतर्फेही दिव्या देशमुखला ११ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.    सरन्यायाधीश न्...

August 2, 2025 8:08 PM August 2, 2025 8:08 PM

views 12

संविधानानं सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधे प्रतिपादन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं  देशात समतेचं राज्य निर्माण करण्यासह, सर्वांना समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते आज बोलत होते.    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वारसा पुढे नेण्याचं कार्य हे महाविद्यालयानं सातत्यानं करत असून ६ हजाराहून अधिक विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयानं हजारो वं...

July 24, 2025 8:17 PM July 24, 2025 8:17 PM

views 8

कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करता यावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे युद्धनीतीचा अवलंब केला, त्या युद्धनीतीतून त्यांची सामरिक शक्ती झळकते. ही युद्धनीती वापरूनच पुढच्या मराठेशाहीत देशभरात मराठ्यांचा बोलबाला झाला. याच सामरिक शक्तीच्या अभ्यासासाठीचं अध्...

July 22, 2025 6:58 PM July 22, 2025 6:58 PM

views 3

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन

गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं. यात एम टी पी ए स्टील प्रकल्प, कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय, सी बी एस ई शाळेची पायाभरणी, सोमनपल्ली इथं लॉयड्स टाऊनशिप, हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलान यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे १४ हजार जणांना रोजगार मिळाला असून आणखी वीस हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. यामुळे गडचिरोलीचं चित्र पालटलं आहे, गडचिरोलीच्या जल आणि जंगलाचं संगोपन करण्याचा प्र...

July 6, 2025 7:26 PM July 6, 2025 7:26 PM

views 10

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती देण्याचं विठ्ठलचरणी साकडं

पांडुरंगाने राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गानं चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विठ्ठलाला घातलं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे मानाच्या वारकरी दांपत्यासह फडनवीस यांनी सपत्निक, विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर यावेळी उपस्थित होते. सर्व विठ्ठल...

July 2, 2025 8:07 PM July 2, 2025 8:07 PM

views 11

गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक-मुख्यमंत्री

गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं करता यावा यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानभवन येथे नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामं श्रेणीबद्ध करावीत, असंही ते म्हणाले.    नवीन फौजदारी कायद्यांमुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करता येत असल्याचं ते म्हणाले. गुन्हे सिद्ध करण्यास...

July 2, 2025 1:48 PM July 2, 2025 1:48 PM

views 12

महाराष्ट्रात वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य वाढवून देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचं आश्वासन

वीज कोसळून मृत्यू झालेले शेतकरी शेतमजूर यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता, आता तो करण्यात आला आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मदत निधी वाढवून देण्याबाबत सूचनांचा विचार करून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन महाजन यांनी दिलं. राज्यातल्या विविध विकास कामांमधे मेघा इंजिनियरिंग या कंपनीनं ३ हजार कोटींचा भ्...

July 2, 2025 8:57 AM July 2, 2025 8:57 AM

views 8

आर्थिक लाभाच्या फसव्या योजनांच्या बाबतीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन

राज्यात अधिक व्याजदराचं आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं. भिमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रशाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले. बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘एसआयटी’ची स...