December 2, 2024 7:41 PM December 2, 2024 7:41 PM

views 10

बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारताकडून खेद व्यक्त

आगरतळा इथं झालेल्या बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारतानं खेद व्यक्त केला आहे. दूतावास मालमत्तांना कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य केले जाऊ नये असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. देशाभरातल्या बांग्लादेश उच्चायुक्त, दूतावास आणि अधिकार्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी भारत सरकार पावले उचलत आहे.

November 30, 2024 2:31 PM November 30, 2024 2:31 PM

views 14

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत – भारत सरकारचं आवाहन

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत, असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक नागरिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर होणारे हल्ले, हे मुद्दे भारतानं प्रकर्षानं मांडल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिल्लीत सांगितलं. बांगलादेश सरकारनं सर्व अल्पसंख्यांक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं ते यावेळी म्हणाले. बांगलादे...

November 29, 2024 2:45 PM November 29, 2024 2:45 PM

views 5

इस्कॉनवर बंदी घालण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – बांगलादेश सरकार

इस्कॉन संस्थेवर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं बांग्लादेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे. बांग्लादेशाच्या हंगामी सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान सल्लागार सैय्यद रिजवाना यांनी काल बातमीदारांशी बोलताना याबाबत खुलासा केला. बांग्लादेशातल्या हिंदू समाजाचे नेते चिन्मय कृष्णदास यांना एका विशेष आरोपांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खटला सुरु असल्याचंही रिजवाना यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्यावरच्या आरोपांबाबत न्यायालय अंतिम निर्णय घेणार असल्याचंही रिजवाना म्हणाले. 

November 27, 2024 9:39 AM November 27, 2024 9:39 AM

views 6

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी, भारताचं बांग्लादेशला आवाहन

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी असं आवाहन भारतानं बांग्लादेश सरकारला केलं आहे. अल्पसंख्याकांच्या मुलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्या बांग्लादेश संमिलीत सनातन जागरण मंच चे प्रवक्ते प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. काल त्यांना जामीन नाकारण्यात आला. या घटनेबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभु दास यांच्या सुटकेची मागणी करत चटगाव न्यायालयाच्या आवारात जमलेल्या इस्कॉन पुंडर...

November 26, 2024 7:51 PM November 26, 2024 7:51 PM

views 5

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज केला आणि आवाजी बॉम्ब फोडले. आपल्या नेत्याच्या सुटकेची मागणी करण्यासाठी त्यांचे अनुयायी चितगाव न्यायालयाच्या आवारात जमले होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. अटकेनंतर त्यांच्या अनुयायांनी सुटकेची मागणी करत चिरागी पहाड परिसरात  निषेध मोर्चा काढला.     

November 18, 2024 9:56 AM November 18, 2024 9:56 AM

views 12

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशमधील अंतरिम सरकार करेल – सल्लागार मुहम्मद युनूस

गेल्या ऑगस्टमध्ये सरकार पडल्यानंतर सध्या भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगला देशमधील अंतरिम सरकार करेल, असं बांगलादेशचे विद्यमान मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे. इथल्या अंतरिम सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते देशाला संबोधित करत होते. आपलं सरकार सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही युनूस म्हणाले.   गेल्या ८ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारलेल्या युनूस यांनी दावा केला की हसीन सरकारच्या विरोधात...

November 15, 2024 8:19 PM November 15, 2024 8:19 PM

views 9

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशपर्यंत विद्युतप्रवाह सुरू

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशापर्यंत विद्युतप्रवाह आज सुरू झाला. बांगलादेशाच्या ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद फौजुल कबीर खान आणि नेपाळचे ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्यासमवेत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी पहिल्या 40 मेगावॅटपर्यंतच्या विद्युतप्रवाहाचं उद्घाटन केलं. त्यामुळे भारत, नेपाळ आणि बांगलादेश यांच्या ऊर्जा सहकार्याला एक नवा आयाम मिळाला आहे, असं ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.

October 13, 2024 3:23 PM October 13, 2024 3:23 PM

views 10

भारताचं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, सुरक्षितत करण्याचे आवाहन

भारतानं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, विशेषत: सणासुदीच्या काळात सुरक्षितता आणि सुरक्षा करण्याचे आवाहन केलं आहे. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानं ढाका येथील तंतीबाजार येथील पूजा मंडपावर झालेला हल्ला आणि सातखीरा येथील पूजनीय जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्या चोरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले खेदजनक असून मंदिरे आणि देवतांची विटंबना आणि नुकसान जाणीवपूर्वक केलं जात असल्याचं भारतानं म्हटलं आहे.    

October 10, 2024 9:00 AM October 10, 2024 9:00 AM

views 14

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतानं 86 धावांनी जिंकला

पुरुषांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांग्लादेशविरुद्ध दिल्ली इथं दुसरा सामना भारतानं 86 धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 222 धावांचं उद्दिष्ट गाठताना पाहुणा संघ वीस षटकांत 9 बाद 135 धावा करु शकला. उभय संघांचा तिसरा सामना शनिवारी हैदराबाद इथं होणार आहे.

October 1, 2024 3:52 PM October 1, 2024 3:52 PM

views 9

बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं जिंकली

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला. बांग्लादेशाकडून मिळालेलं ९५ धावांचं आव्हान भारतानं ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं ही मालिका २-० अशी जिंकली. यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर. अश्विन मालिकावीर ठरला.    पाचव्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला. जसप्रित बुमराह, आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यशस्वी जयस्वालच्या ५१ आणि विराट कोहलीच्या नाबाद २९ धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला.