December 8, 2024 8:47 PM

views 18

U१९ आशिया चषक : भारताचा ५९ धावांनी पराभव होऊन बांग्लादेश विजयी

दुबई इथं झालेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ५९ धावांनी पराभव करून बांग्लादेशानं विजेतेपद पटकावलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांग्लादेशाच्या गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण संघ ३५ षटकं आणि दोन चेंडूत केवळ १३९ धावा करून तंबूत परतला.   भारताच्या वतीनं कर्णधार मोहम्मद आमन यानं सर्वाधिक २६ धावा केल्या. अंतिम सामन्यात भारताचे ३ तर संपूर्ण स्पर्धेत एकूण १० गडी बाद केलेल्या बांग्लादेशाचा गोल...

December 8, 2024 3:41 PM

views 21

U१९ आशिया चषक : अंतिम सामन्यात बांग्लादेशाचं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी देखील बांग्लादेशाच्या फलंदाजीला लगाम घालत, त्यांचा संपूर्ण संघ १९८ धावांतच तंबूत धाडला. बांग्लादेशाच्या वतीनं मोहम्मद रिझान यानं सर्वाधिक ४७ धावा केल्या. भारताच्या युद्धजीत, चेतन आणि हार्दिक यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारता...

December 8, 2024 3:25 PM

views 34

कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार

ओमानची राजधानी मस्कत इथं सुरु असलेल्या कनिष्ठ महिला आशिया हॉकी कप स्पर्धेत आज भारताचा सामना बांगलादेशाबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. भारतीय संघाचं नेतृत्व ज्योती सिंह हिच्याकडे सोपवण्यात आलेलं असून साक्षी राणा उपकर्णधार आहे. काल स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात चीननं बांगलादेशचा १९ - ० असा दणदणीत पराभव केला.   अ गटात झालेल्या इतर सामन्यात मलेशियानं थायलंडला ३-० असं पराभूत केलं. ब- गटातल्या सामन्यात जपाननं श्रीलंकेचा १५-० नं पराभव केला. पुढच्या ...

December 4, 2024 10:34 AM

views 1

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनकडून व्यक्त

बांग्लादेशमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटननं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटक भेट देत असलेली ठिकाणं, गर्दीची ठिकाणं, सांस्कृतिक ठिकाणं आणि राजकीय सभांच्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या फॉरेन कॉमनवेल्थ आणि डेव्हलमेंट ऑफिसनं वर्तवली आहे.  

December 2, 2024 7:41 PM

views 14

बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारताकडून खेद व्यक्त

आगरतळा इथं झालेल्या बांग्लादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालय परीसर तोडफोड प्रकरणी भारतानं खेद व्यक्त केला आहे. दूतावास मालमत्तांना कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य केले जाऊ नये असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. देशाभरातल्या बांग्लादेश उच्चायुक्त, दूतावास आणि अधिकार्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी भारत सरकार पावले उचलत आहे.

November 30, 2024 2:31 PM

views 21

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत – भारत सरकारचं आवाहन

बांगलादेश सरकारनं अल्पसंख्याक नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलावीत, असं आवाहन भारत सरकारनं केलं आहे. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक नागरिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर होणारे हल्ले, हे मुद्दे भारतानं प्रकर्षानं मांडल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल दिल्लीत सांगितलं. बांगलादेश सरकारनं सर्व अल्पसंख्यांक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं ते यावेळी म्हणाले. बांगलादे...

November 29, 2024 2:45 PM

views 12

इस्कॉनवर बंदी घालण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – बांगलादेश सरकार

इस्कॉन संस्थेवर बंदी घालण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचं बांग्लादेच्या सरकारनं स्पष्ट केलं आहे. बांग्लादेशाच्या हंगामी सरकारचे पर्यावरण, वन आणि हवामान सल्लागार सैय्यद रिजवाना यांनी काल बातमीदारांशी बोलताना याबाबत खुलासा केला. बांग्लादेशातल्या हिंदू समाजाचे नेते चिन्मय कृष्णदास यांना एका विशेष आरोपांतर्गत अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खटला सुरु असल्याचंही रिजवाना यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्यावरच्या आरोपांबाबत न्यायालय अंतिम निर्णय घेणार असल्याचंही रिजवाना म्हणाले. 

November 27, 2024 9:39 AM

views 13

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी, भारताचं बांग्लादेशला आवाहन

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी असं आवाहन भारतानं बांग्लादेश सरकारला केलं आहे. अल्पसंख्याकांच्या मुलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्या बांग्लादेश संमिलीत सनातन जागरण मंच चे प्रवक्ते प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. काल त्यांना जामीन नाकारण्यात आला. या घटनेबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभु दास यांच्या सुटकेची मागणी करत चटगाव न्यायालयाच्या आवारात जमलेल्या इस्कॉन पुंडर...

November 26, 2024 7:51 PM

views 14

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज केला आणि आवाजी बॉम्ब फोडले. आपल्या नेत्याच्या सुटकेची मागणी करण्यासाठी त्यांचे अनुयायी चितगाव न्यायालयाच्या आवारात जमले होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. अटकेनंतर त्यांच्या अनुयायांनी सुटकेची मागणी करत चिरागी पहाड परिसरात  निषेध मोर्चा काढला.     

November 18, 2024 9:56 AM

views 22

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशमधील अंतरिम सरकार करेल – सल्लागार मुहम्मद युनूस

गेल्या ऑगस्टमध्ये सरकार पडल्यानंतर सध्या भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगला देशमधील अंतरिम सरकार करेल, असं बांगलादेशचे विद्यमान मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे. इथल्या अंतरिम सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते देशाला संबोधित करत होते. आपलं सरकार सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही युनूस म्हणाले.   गेल्या ८ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारलेल्या युनूस यांनी दावा केला की हसीन सरकारच्या विरोधात...