June 17, 2025 3:54 PM
10
११ वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना
गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रसरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी भरीव उपाययोजना केल्या आहेत. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांनी प्रेरित होऊन भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे. त्यात प्रामुख्याने भारताच्या आरोग्य सेवेचा समावेश आहे. आयुष्मान भारतसारख्या प्रमुख उपक्रमांनी जवळजवळ ५५ कोटी लोकांना आर्थिक संरक्षण दिलं आहे. आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत ७० वर्षं आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य हमीचे योजनेचे फायदे देण्यात आले आहेत. आयुष्मान भारत डिजिटल मिशनने ...