राष्ट्रीय

September 18, 2024 1:03 PM September 18, 2024 1:03 PM

views 7

उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं भारत आणि उरुग्वे यांच्यात चर्चेची सहावी फेरी

भारत आणि उरुग्वे यांच्यातली चर्चेची सहावी फेरी १६ सप्टेंबर रोजी उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं झाली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, रेल्वे, आयुर्वेद आणि योग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक जागतिक प्रश्नांवरही चर्चा झाली. या...

September 18, 2024 1:00 PM September 18, 2024 1:00 PM

views 15

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नवी दिल्लीत बैठक

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ, स्वच्छ ऊर्जा आणि समुद्री क्षेत्र या विविध विषयांमधील परस्पर सहकार्याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक क्षेत्रातल्या दोन दोन प्रतिनिधींच्या या अंतरस्तरीय बैठकींच्या माध्यमातून चर्चा झाल्या अ...

September 18, 2024 12:53 PM September 18, 2024 12:53 PM

views 12

उत्तरप्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तरप्रदेशात सततचा मुसळधार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आलेल्या पुराचा फटका चोवीस जिल्ह्यातल्या पाच लाख लोकांना बसला आहे. राज्यातल्या जवळपास सर्व नद्यांना पूर आला असून गंगा आणि घागरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. राज्यातल्या प्रमुख शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे. वाराणसी आणि ...

September 18, 2024 1:41 PM September 18, 2024 1:41 PM

views 8

साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दराने न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन

साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन देशात आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दराने विकू नये असं केंद्रसरकारने खाद्यतेल विक्रेता संघटनांना सांगितलं आहे.  हा साठा पूर्णपणे संपत नाही.  तो पर्यंत किरकोळ  खाद्यतेलाचे भाव वाढवू नयेत असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. खाद्यतेलाच्या दरनिश्चितीबाबत अन्न आणि सार्व...

September 18, 2024 12:43 PM September 18, 2024 12:43 PM

views 12

भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण कालं नवी दिल्ली इथं केलं. यावेळी रोमानियाच्या भारतातल्या राजदूत डॅनिएला मरियाना सेजोनोव उपस्थित होत्या.  हे टपाल तिकीट भारत आणि रोमानिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतिक आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. द...

September 18, 2024 12:26 PM September 18, 2024 12:26 PM

views 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर जात आहेत. जयपूरमधल्या मालविय नॅशनल इन्स्टिट्यू ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातल्या पदवीदान समारंभात त्या आज प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या वसतीगृहाचंही त्या उद्घाटन करणार आहेत. या कार्यक...

September 18, 2024 10:17 AM September 18, 2024 10:17 AM

views 8

२०३०पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी गांधीनगर मध्ये झालेल्या पुनर्गुंतवणूक बैठकीच्या चौथ्या टप्प्यात २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सुमारे ३२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. जोशी पत्रकार परिषदेत बोलत होते. विविध राज्य सरकारे आणि खाजगी उत्पादकांसह सर...

September 18, 2024 11:02 AM September 18, 2024 11:02 AM

views 12

‘केंद्र सरकारने भारताचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली’

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेतला असून सरकारने पहिल्या १०० दिवसांत भारताचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारताने या वर्षी जुलैमध्ये दिल्ली इथं जागतिक वार...

September 19, 2024 10:08 AM September 19, 2024 10:08 AM

views 8

इस्रो पहिल्या मानवरहित गगनयान अभियान मोहिमेसाठी सज्ज

  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो गगनयान कार्यक्रमांतर्गत पहिल्या मानवरहित मोहिमेसाठी सज्ज होत आहे, असं विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितलं. ते काल बेंगळुरू इथं आठव्या बेंगळुरू अंतरिक्ष प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   ...

September 18, 2024 9:58 AM September 18, 2024 9:58 AM

views 9

नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ ऐतिहासिक असल्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचं प्रतिपादन

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नरेंद्र मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ ऐतिहासिक असल्याचं म्हटलं असून पहिल्या १०० दिवसांमध्ये सरकारने लोकांच्या कल्याणासाठी १५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. आकाशवाणीशी विशेष संवाद साधताना रिजिजू म्हणाले की, सरकार ...