November 17, 2024 8:01 PM

views 11

वंचित समुदायाच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यात कायद्याची भूमिका महत्वपूर्ण – सर्वोच्च न्यायालय

वंचित समुदायाच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यात कायद्याची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. वंचित समुदायाचं  सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या दिशेनं पाऊल’ या विष...

November 17, 2024 7:11 PM

views 21

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या, लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बॉलिवुड अभिनेत्यांना दिलेल्या धमक्या इत्यादी प्रकरणांकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि या ...

November 17, 2024 7:06 PM

views 29

मविआची सत्ता आल्यास वाढवण, मोरबे बंदर होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर वाढवण आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोईसर इथल्या प्रचारसभेत सांगितलं. आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या विरुद्ध असून पालघर जिल्ह्याचा विकास महाविकास आघाडी करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.  

November 17, 2024 8:02 PM

views 15

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतला. संरक्षण, उर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात नायजेरियाबरोबरच्या भागीदारीला भारताच्या दृष्टीने महत्त्व असल्याचं ...

November 17, 2024 7:44 PM

views 18

‘महायुती सत्तेत आल्यानंतरच राज्य प्रगतीपथावर पुढं गेलं, यानंतरही पुढंच नेऊ’

महायुतीचं सरकार आल्यानंतरच राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे गेलं असून, यापुढंही आपण ते पुढंच नेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्यात साक्री इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारची मदत घेतली. त्यानंतर सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार...

November 17, 2024 7:43 PM

views 42

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर मात

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आज भारताने आज जपानवर ३-० अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बिहारमध्ये राजगीर इथं हा सामना झाला. भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी आपल्या खेळाची कमाल दाखवत हा विजय मिळवून दिला. आता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी पुन्हा भार...

November 17, 2024 7:41 PM

views 23

१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रबाहेर गेल्याची प्रियंका गांधींची टीका

महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या आज गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या.    केंद्र सरकार महत्त्वाची बंदरं...

November 17, 2024 6:26 PM

views 32

स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न – मायावती

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, मायावती यांनी आज, पुण्यात बसप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न आहे, परंतु, ते मिळालं नाही तर बहुमत मिळवून सरकार बनवणाऱ्या पक्षाला आपला पाठिंबा राहील असं मायावती यांनी यावेळी जाहीर केलं.

November 17, 2024 5:22 PM

views 17

इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी क्षेत्रात निगराणी ठेवायला भारताला मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका वचनबद्ध

इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी क्षेत्रात निगराणी ठेवायला भारताला मदत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेने आज स्पष्ट केलं. ऑस्ट्रेलियामधल्या डार्विन इथं ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्ल्स, जपानचे संरक्षण मंत्री नाकातनी जेन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांच...

November 17, 2024 3:47 PM

views 16

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात जी विकासकामं केली आहेत, त्यामुळे राज...