डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला.भारतानं दिलेल्या  247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. क्रांती गौड सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. स्पर्धेत भारताचा हा दुसरा विजय असून  भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. भारताचा सामना आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या 9 तारखेला विशाखापट्टणम  इथं होणार आहे.