देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास हे विकसित भारताच्या उभारणीतील एक महत्त्वाचं पाऊल ठरेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओडिशामध्ये केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा प्रारंभ झाला. त्या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर व्हिडिओ संदेश प्रसारित केला. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा; कृषी अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
Site Admin | May 30, 2025 9:25 AM | Viksit Bharat | Viksit Krishi Sankalp Abhiyan
कृषी क्षेत्राचा विकास हे विकसित भारताच्या उभारणीतील महत्त्वाचं पाऊल – प्रधानमंत्री
