डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शिक्षण समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षण म्हणजे केवळ पदवी नसून समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम आहे, असं प्रतिपदान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. ते आज राजस्थानमधल्या अजमेर इथं केंद्रीय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात उच्च शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असेल, असंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात रोज नवीन भर घातली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या वीरांचं स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक कृतीत प्रथम राष्ट्रहिताचा विचार करावा, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं.