उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरा बदलण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. तसंच, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.

 

एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मेट्रो सेवेचा समावेश असेल. तसंच शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बस सुविधा सुरू करण्यात येईल, अशी आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.