२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १९ जूनपर्यंत देशाचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४ पूर्णांक ८६ शतांश टक्के वाढून सुमारे ५ लाख ४५ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
मात्र एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १ पूर्णांक ३९ शतांश टक्के किरकोळ घसरण नोंदवली गेली. ही घसरण प्रामुख्याने कर परताव्यात ५८ टक्के वाढ झाल्यामुळे आहे.
प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत आगाऊ कर संकलन १ लाख ५५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं असून, यात ३ पूर्णांक ८७ शतांश टक्के वाढ झाली.