September 13, 2024 8:13 PM September 13, 2024 8:13 PM

views 13

५ अब्ज २५ कोटी डॉलरची वाढ होऊन देशाचा परकीय चलन साठा विक्रमी पातळीवर

देशाच्या परकीय चलन साठ्यात ५ अब्ज २५ कोटी डॉलरची वाढ होऊन तो  ६८९ अब्ज २३ कोटी डॉलरच्या विक्रमी स्तरावर पोहचला, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. गेल्या शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात दरम्यान, परदेशी चलन साठ्याचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या परदेशी चलन मालमत्तेत देखील ५ अब्ज ११ कोटी डॉलरची वाढ होऊन ती  ६०४ अब्ज १४ कोटी डॉलरवर  पोहोचली आहे. दरम्यान, देशाच्या सुवर्ण भांडाराचे आरक्षित मूल्य १२ कोटी ९ लाख डॉलरने वाढून ६१ अब्ज ९९ कोटी डॉलर इतकं झालं आहे. तर, आंतरराष्ट्रीय चलन साठ्यात देशाचा आरक्षि...

September 5, 2024 8:14 PM September 5, 2024 8:14 PM

views 8

चालू आर्थिक वर्षासाठी ७ पूर्णांक २ दशांश टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज – आरबीआय

भारताची आर्थिक वाढ योग्य मार्गावर सुरू असून चालू आर्थिक वर्षासाठी ७ पूर्णांक २ दशांश टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज हा वास्तवाला धरून आहे, असं प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांनी मुंबईत संयुक्तपणे आयोजित केलेल्या फिबॅक परिषदेत ते बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था ही स्थूल आर्थिक स्थैर्याने प्रगती करत असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. सर्व समावेशक वाढीचं महत्त्वही दास यांनी अ...

September 3, 2024 8:09 PM September 3, 2024 8:09 PM

views 6

भारताच्या शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची – आरबीआय

भारताच्या समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मिशेल पात्रा यांनी म्हटलं आहे.  ते आज भारतीय उद्योग महासंघानं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेला  संबोधित करत होते. अर्थकारण आणि विकासामधला परस्पर संबंध लक्षात घेता, भारताचं भविष्य घडवण्यात आणि त्याला आकार देण्यात आर्थिक क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व असल्याचं ते यावेळी म्हणाले.    डॉ. पात्रा यांनी पायाभूत सुविधांचा अर्थपुरवठा, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कौशल्...

August 26, 2024 1:25 PM August 26, 2024 1:25 PM

views 7

डिजिटल व्यवहारांमध्ये भारताचं क्रांतिकारी पाऊल – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

आर्थिक व्यवहारांसाठी उपयोगी असणाऱ्या GEM, UPI आणि ULI या तीन पद्धतींमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये भारतानं क्रांतिकारी पाऊल टाकल्याचं प्रतिपादन रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज केलं. रिझर्व बँकेच्या नव्वदाव्या वर्षानिमित्त सुरू असलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून बेंगळुरू इथं डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीची जागतिक परिषद आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणणाऱ्या यूपीआय पद्धतीचं कौतुक केलं. तसंच, आता रिझर्व बँ...

August 21, 2024 3:51 PM August 21, 2024 3:51 PM

views 7

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये ए प्लस रेटिंग

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये सलग दुसऱ्यांदा ए प्लस रेटिंग मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. आरबीआयनं एक्स समाज माध्यमावरील पोस्टवर प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा हा सन्मान मिळवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. दास यांच्या नेतृत्वाखाली आरबीआयला स्थिरता मिळाली असून आर्थिक विकासाला योग्य दिशा मिळाल्याचंही प्रधानमंत्र्यांनी पोस्टमध्ये नमूद क...

August 21, 2024 1:08 PM August 21, 2024 1:08 PM

views 11

खासगी उद्योगांची गुंतवणूक ५४ टक्क्यांनी वाढेल – आरबीआयचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात देशात खासगी उद्योगांची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढेल, असा भारतीय रिझर्व बँकेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ही गुंतवणूक एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस कोटी होती, ती यंदा दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे बारा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. देशांतर्गत मागणीतही वाढ होत असून विशेषतः ग्रामीण भागात मागणी वाढत असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे.

August 20, 2024 10:31 AM August 20, 2024 10:31 AM

views 11

गैरप्रकार रोखण्यासाठी आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक सूचना

व्यक्ति ते व्यक्ती आर्थिक व्यवहारातील गैरप्रकार रोखून गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी रिझर्व बँकेनं नव्या मार्गदर्शक सूचना काल तत्काळ प्रभावानं जाहीर केल्या. पारंपरिक बँकींग पद्धतीला फाटा देऊन पी टू पी माध्यमांमुळे धनको आणि ऋणको थेट एकमेकांच्या संपर्कात येतात. यामध्ये वाढीव कर्ज पुरवठा किंवा हमी देताना निर्माण होणारी जोखीम गृहित धरुन अशा पुरवठादारांवर विमा उत्पादनांची विक्री करण्याबाबत आता निर्बंध घातले आहेत. व्यवहारांमध्ये मुद्दल, व्याज किंवा दोन्हींचे नुकसान झाल्यास ते धनकोने भरुन द्यावं लागेल ...

August 13, 2024 7:01 PM August 13, 2024 7:01 PM

views 13

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी बचत गटांसाठी कार्यशाळांचे आयोजन

महिलांमधे आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक कार्यशाळा आयोजित करते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील बचत गटांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळांत फसवणुकीसाठी वापरल्या जात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारांची आणि त्यापासून वाचण्यासाठीच्या उपायांची माहिती देण्यात आली. कोणत्याही अमिषाला बळी न पडता सतर्क राहून आर्थिक व्यवहार करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

August 13, 2024 12:58 PM August 13, 2024 12:58 PM

views 8

गुंतवणूकदारांना आपत्कालीन परिस्थितीत शंभर टक्के रक्कम परत करण्याचे आरबीआयचे निर्देश

बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी आपल्या ठेवीदारांना आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणुकीच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये ठेवीची १०० टक्के रक्कम परत करावी असे  निर्देश भारतीय रिझर्व बँकेनं दिले आहेत. मुदतपूर्व काढल्या गेलेल्या अशा ठेवींवर व्याज दिलं  जाणार नाही, असं रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.    गुंतवणूकदारांना अन्य कोणत्याही कारणासाठी मुदतपूर्व गुंतवणूक मोडायची असेल, तर मूळ गुंतवणुकीच्या ५० टक्के, अथवा ५ लाख रुपये, यापैकी जी  कमी असेल, तेवढी  रक्कम काढता येईल, मात्र त्यावर व...

August 8, 2024 7:31 PM August 8, 2024 7:31 PM

views 13

अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ – आरबीआय

अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ मिळत असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. २०२९ सालापर्यंत अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून भारतात येणारं परकीय चलन १६० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज असल्याचं यात म्हटलं आहे.