August 8, 2024 9:42 AM

views 34

देशाची प्रगती आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

करविषयक कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून त्याद्वारे देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल लोकसभेत दिली. अर्थ विधेयक 2024 वरच्या चर्चेला त्या उत्तर देतांना त्या बोलत होत्या.   गेल्या दशकात कर रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. करांमध्ये भरमसाठ वाढ न करता यात सुलभीकरण आणलं आहे. यामुळे पारदर्शकता वाढली आहे, असंही त्या म्हणाल्या. मध्यमवर्गावरचं कराचं ओझं वाढल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. या उलट, वजावटी...

August 6, 2024 3:39 PM

views 12

बांगलादेशातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारची सर्वपक्षीय बैठक

बांगलादेश मधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज या मुद्द्यावर सर्व नेत्यांना माहिती दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.   दरम्यान, बांगलादेशच...

August 5, 2024 8:31 PM

views 14

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जम्मू- काश्मिर आणि लडाखमधल्या लोकांसाठी सरकार काम करत असून आगामी काळात या राज्यातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पाच वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट रोजी संसदेनं कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये प्रगती आणि समृद्धीच्या नव्या पर्वाची  सुरुवात होती असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्यामुळे महिला, तरुण, मागासवर्गीय, आदिवासी आणि विकासापासून वंच...

August 5, 2024 7:40 PM

views 16

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

देशातल्या विक्रमी गॅस उत्पादनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातली आत्मनिर्भरता महत्वाची असल्यातं ते म्हणाले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या समाज माध्यमावरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे. २०२०- २१ मध्ये गॅसचे उत्पादन सुमारे २८ अब्ज ७० कोटी घनमीटर होतं. जे २०२३-२४ मध्ये वाढून सुमारे अब्ज ४३ कोटी घनमीटर झालं आहे. २०२६ पर्यंत देशात गॅसचं उत्पादन ४५ अब्ज ३ कोटी घनमीटर पर्...

August 4, 2024 2:53 PM

views 20

कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा

नवी दिल्ली इथं आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा केली आहे. या सहा दिवसीय परिषदेला ७५ देशांमधले कृषी अर्थतज्ञ उपस्थित असून त्यांनी  भारताच्या कृषिक्षेत्रातल्या कामगिरीचं आणि संशोधनाचं कौतुक केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं. भारत अनेक कृषी उत्पादनांमधला अग्रणी उत्पादक आहे, भारताची वैविध्यपूर्ण जैवसंस्था आणि कृषी शिक्षणासाठ...

August 3, 2024 8:12 PM

views 7

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचे प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे, सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषिक्षेत्र आहे, असं ते म्हणाले. तृणधान्यं, दूध, डाळी आणि मसाल्यांचं सर्वात जास्त उत्पादन भारतात ...

August 3, 2024 1:50 PM

views 18

सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषिक्षेत्र असल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे, सर...

July 31, 2024 10:03 AM

views 39

देश वेगानं प्रगती करीत असून सरकारचं प्रत्येक क्षेत्रावर लक्ष असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते. देशात रोजगाराला चालना देणाऱ्या सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन देऊन, सरकार नागरिकांना रहाणीमानातली सुलभता आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन...

July 28, 2024 7:21 PM

views 17

‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन

येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे बारावा भाग होता. हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले.   स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी MyGov किंवा NaMo App वर सूचना पाठवण्याचं आव...

July 28, 2024 12:51 PM

views 18

‘मन की बात’ या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. तुमचे अभिनंदन करतो आहे. सध्या संपूर्ण जगावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांची मोहिनी पसरलेली आहे. ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्याची संधी देतात, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी देतात. तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवा, भारताला पाठींबा द्या!   मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्र...