October 25, 2024 2:32 PM
22
भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असून पुढच्या २५ वर्षात हे संबंध नवी उंची गाठतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या आशियाई पॅसिफिक परिषदेलाही ते संबोधित करत होते. भारत हे वैविध्य आणि सुरक्षिततेचं केंद्र बनत असून भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध जगाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. जगाला स्थिरता, विश्वास आणि पारदर्शकतेची गरज आहे, समाज आणि पुरवठा साखळीमध्येही या मूल्यांची अत्यंत आवश्यकता आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.  ...