November 12, 2025 6:56 PM November 12, 2025 6:56 PM

views 15

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया-कृषी मंत्री

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया असून, पाश्चात्य देशांच्या उदयापूर्वीच भारतानं  विविध पिकांचं बीज विकसित केलं होतं असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वनस्पती प्रजाती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करत होते. वनस्पतींच्या विविध प्रजातींचं संरक्षण करण्यासाठी कायदा करणारा भारत हा जगातला पहिला देश असल्याचं ते यावेळी म्हणाले.  शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या बियाण्यांचं जतन करण्यासाठी आवश्यक संरच...

August 28, 2025 1:42 PM August 28, 2025 1:42 PM

views 2

स्वदेशी ही भारताची खरी शक्ती- केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

स्वदेशी ही भारताची खरी शक्ती असून देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वदेशीचा स्वीकार करावा लागेल, असं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.   एक्स या समाज माध्यमावर स्वदेशी अपनाओ' मोहिमेबद्दल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वदेशी हे फक्त एक कापड किंवा वस्तू नसून तो देशातल्या शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आदर, कारागिरांच्या कौशल्याची ओळख आणि आपल्या उद्योगांचा आदर आहे, असं त्यांनी म्हटलं.

July 14, 2025 10:38 AM July 14, 2025 10:38 AM

views 1

बनावट खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश

बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांविरुद्ध तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रानं दिले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत देशातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.   बनावट खतांची विक्री, खतांचा काळाबाजार यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार खतांचा पुरवठा करणं आवश्यक आहे, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. 

March 11, 2025 1:40 PM March 11, 2025 1:40 PM

views 14

२०२४-२५ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२४-२५ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार खरीप अन्नधान्य उत्पादन एक हजार ६६४ लाख मेट्रिक टन तर रब्बी अन्नधान्य उत्पादन एक हजार ६४५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. या वर्षासाठी तांदळाचं उत्पादन एक हजार २०६ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे.   २०२३-२४ मध्ये हे उत्पादन एक हजार १३२ लाख मेट्रिक टन होतं . तूर आणि हरभऱ्याचं उत्पादन अनुक्रमे ३५ लाख ११ हजार मेट्रिक टन आणि ११५ लाख ३५ हज...

February 23, 2025 1:40 PM February 23, 2025 1:40 PM

views 7

चंदीगढ : कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा

चंदीगढ इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चर्चा केली. किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली, शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या, असं केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं. चर्चेची पुढची फेरी १९ मार्चला होणार आहे.

January 6, 2025 8:46 PM January 6, 2025 8:46 PM

views 6

खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांनी प्रयत्नांना अधिक गती द्यावी- शिवराजसिंग चौहान

खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णतेचं उद्धिष्टं गाठण्यासाठी राष्ट्रीय  खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांना प्रयत्नांना अधिक गती द्यावी, असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत, याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेचा भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत २०२५-२६ पर्यंत साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ऑईलपामच्या लागवडीखाली आणण्याचं उद्धिष्ट आहे. यात काही अडचणी असतील तर त्या दूर करुन, आणि उपलब्ध संसाधना...

December 24, 2024 10:19 AM December 24, 2024 10:19 AM

views 2

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गरीबांसाठी यंदा 19 लाखांहून अधिक घरं देणार -शिवराज सिंह चौहान

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरं यंदा देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल पुण्यात केली. किसान सन्मान दिवसाच्या निमित्ताने पुण्यातील कृषीविज्ञान केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद वाढवली असल्याचं त्यांनी सांगितल.    या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुखउपस्थिती होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ...

December 24, 2024 10:19 AM December 24, 2024 10:19 AM

views 10

शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज – शिवराज सिंह चौहान

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स आणि इकानाॅमिक्स संस्थेच्या अमृत महोत्सव परिषदेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी झाले होते.  आजच्या  राष्ट्रीय शेतकरी दिवसाचं औचित्य साधून,  कृषी संबंधित विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन आणि नविनीकरणाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून आमचं सरकार त्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. अद्यायावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहत आणले जाईल, असं चौहान यांनी यावेळी सांगितलं. प्रयोगशाळेत होणारे यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहो...

December 17, 2024 1:51 PM December 17, 2024 1:51 PM

views 2

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारचं सहा कलमी धोरण

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्रसरकारने सहा कलमी कार्यक्रम तयार केला असल्याची माहिती आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.  यात उत्पादकतेत वाढ, उत्पादन खर्चात कपात, पिकांना हमीभाव, नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, लागवडीत विविधता आणि सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन या मुद्द्यांचा समावेश आहे. २००२-२००३ मधे शेतकऱ्यांचं उत्पन्न दरमहा दोनहजार ११५ रुपये होतं ते २०१८-१९ या वर्षापर्यंत दरमहा दहा हजार २१८ रुपयांपर्यंत पोहोचलं. त्याखेरीज शेत...

November 25, 2024 7:00 PM November 25, 2024 7:00 PM

views 8

१४ राज्यांमधील  २२७ लिंगभाव संसाधन केंद्राचं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन

नयी चेतना 3.0 मोहिमेअंतर्गत १४ राज्यांमधील  २२७ लिंगभाव संसाधन केंद्राचं आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत उद्घाटन केलं. ही मोहिम २३ डिसेंबरपर्यंत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालणार आहे. एक साथ, एक आवाज, हिंसा के खिलाफ असं या मोहिमेचं घोषवाक्य आहे.   महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं चौहान यांनी सांगितलं. देशातील लिंग-आधारित हिंसाचार नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवावा,असं आ...