March 22, 2025 5:24 PM
31
मणिपूरमधे शांतता आणि सौहार्दसाठी एकत्रित काम करण्याचं न्या. भूषण गवई यांचं आवाहन
मणिपूरमधे शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे, असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं. गवई यांनी विक्रम नाथ, एम एम सुंद्रेश आणि के व्ही विश्वनाथन यांनी छुराचांदपूर जिल्ह्यातल्या मदत छावणीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेनं सर्व नागरिकांना समान अधिकारांची हमी दिली आहे, असंही ते म्हणाले. गवई अध्यक्ष ...