May 5, 2025 3:58 PM May 5, 2025 3:58 PM

views 16

बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर  झाला. परीक्षेचा एकूण निकाल ९१ पूर्णांक ८८ शतांश टक्के इतका लागला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात बोर्डाची परीक्षा घेण्यात आली.    कोकण विभागाचा निकाल ९६ पूर्णांक ७४ शतांश टक्के लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वल स्थानी आला आहे. त्यापाठोपाठ मुंबई विभागाचा निकाल ९२ पूर्णांक ९३ शता...