January 7, 2025 7:06 PM

views 27

‘भारतपोल’ आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील-अमित शाह

‘भारतपोल’ पोर्टल आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.  ते आज नवी दिल्ली इथं सीबीआयनं विकसित केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचं उदघाटन करताना बोलत होते. हे पोर्टल तपास यंत्रणा आणि सर्व राज्यांच्या पोलिसांना १९५ देशांच्या इंटरपोल नेटवर्कशी जोडून गुन्हेगारीचं नियंत्रण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं ते यावेळी म्हणाले.    आतापर्यंत भारतात गुन्हे करून इतर देशांमध्ये आश्रय घेणारे...

January 2, 2025 8:12 PM

views 29

कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्था उध्वस्त केल्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद केवळ नियंत्रितच केला नाही, तर कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्थाच उध्वस्त केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत जम्मू-कश्मीरवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलत होते.  ३७० वं कलम हटवल्यानंतर दहशतवादी कारवायांमधे ७० टक्के इतकी लक्षणीय घट दिसून आली आहे. त्याबरोबरच जम्मू-कश्मीरचा विकासही सुुरु झाला आहे, असं ते म्हणाले. 

November 29, 2024 9:57 AM

views 21

देशातला दहशतवाद कमी करण्यात लक्षणीय यश – गृहमंत्री अमित शाह

गेल्या १० वर्षांत देशातील दहशतवाद, डावी विचारसरणी, बंडखोरी आणि अंमली पदार्थ यांचा घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश मिळालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये झालेल्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ठोस धोरणांचे अपेक्षित परिणाम झाले आहेत.   ३१ मार्च २०२६ पर्यंत डाव्या विचारसरणीचा समूळ नायनाट केला जाईल,” असं ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, ड...

November 27, 2024 9:24 AM

views 19

भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सहकार मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची – मंत्री अमित शाह

वर्ष २०२७ पर्यंत भारत जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, आणि या गौरवशाली प्रवासात सहकार मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला. राष्ट्रीय सहकारी बँक महासंघाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात शाह बोलत होते. विकासाच्या प्रवासात सहकाराचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं सांगून, देशाच्या प्रत्येक नागरिकाला सामावून घेणारा विकास केंद्र सरकारला अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. महासंघानं प्राथमिक कृषी कर्ज समिती म्हणजेच पॅक्स, जिल्...

November 18, 2024 10:01 AM

views 33

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेतला. अमित शहा आजही नवी दिल्ली इथं स्वतंत्र बैठक घेणार असून एकंदर सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. काल मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी झालेल्या हिंसाचारात अनेक जण मृत्युमुखी पडले असून सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. यामध्ये सामील असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं गृह मंत्रालयानं प्रसिद...

November 15, 2024 7:59 PM

views 21

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण

बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून, नवी दिल्लीत बानसेरा पार्क इथं उभारलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. या निमित्तानं सराई कालेखान चौकाचं नामांतर भगवान बिरसा मुंडा चौक करायचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

November 15, 2024 6:41 PM

views 25

महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन

राज्यातलं महायुतीचं सरकार गरजू जनतेला समर्पित आहे, ते पुन्हा सत्तेत आणा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. जनतेला घरं, स्वच्छतागृहं, पिण्याचं पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर, मोफत औषधोपचार अशा विविध व्यवस्था हे सरकार देत आहे, असं ते म्हणाले.    काश्मीरमधे 370 कलम पुन्हा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, पण त्यांना हे कदापी शक्य होणार नाही, अशी टीका शहा यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. हिंदुत्वाला प...

November 13, 2024 8:27 PM

views 16

महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महायुतीचं सरकार राज्यात असेल तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळे इथं व्यक्त केला. लांगुलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या महाविकास आघाडीने देशाच्या सुरक्षेला वेठीला धरल्याची टीकाही शाह यांनी यावेळी केली. मात्र, केंद्रातल्या सरकारचं देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. काँग्रेसने मात्र प्रगतीत अडथळे आणले.    २००४ ते २०१४पर्यंत काँग्रेसने राज्याला १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला तर त्यानंतर आलेल्या भाज...

November 13, 2024 3:39 PM

views 25

राज्यात महायुतीचं सरकार येईल – गृहमंत्री अमित शाह

राज्यातली जनता ही महायुतीच्या सोबत असून या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज धुळे इथे व्यक्त केला. शिंदखेडा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसुध्दा कमळाच्या आणि महायुतीच्या सोबत आहेत असं सांगतानाच शाह यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

November 10, 2024 7:03 PM

views 20

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश – गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात शिगेला पोचला असून, आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रोड शो इत्यादींच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज राज्यात प्रचारदौरा केला.    तत्त्वांसोबत तडजोड करत कसंही करून सत्तेत येणं हा महाविकास आघाडीचा एकमेव उद्देश आहे, तर शिवाजी महाराजांच्या तत्त्वांना अनुसरून  महाराष्ट्राला देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश आहे, असं गृहमंत्री अमित शाह रावेर इथल्या प्रचारसभेत ...