September 3, 2024 10:21 AM

views 21

मराठवाड्यात २८४ मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस कायम असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. विभागातल्या २८४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, ६३ गावांना फटका बसला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत आहे. दरम्यान, मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले, काही गा...

September 2, 2024 7:50 PM

views 25

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसात ४ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी

राज्याच्या विविध भागात पावसानं जोर धरला आहे. मराठवाड्यात हिंगोली, जालना आणि परभणीत काल रात्री जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरं या अतिवृष्टीत दगावली आहेत. १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आढावा घेतला असून, शेतीसह इतरही नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन प्रशासनानं त्वरित मदत करावी, असेही निर्देश दिले आहेत.    नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचं ...

September 2, 2024 7:18 PM

views 15

आंध्रप्रदेश, तेलंगण आणि महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे पूरस्थिती

देशाच्या विविध भागात पावसाचा जोर असून ठिकठिकाणी नद्यांचे प्रवाह फुगले आहेत. तेलंगण, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यात करापरा नदीला पूर आल्याने जिंतूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे.  अनेक घरांमध्ये पाणी आल्याने जनजीवन विस्कळित झालं असून ,सोयाबीन कापूस पिकात पाणी साचल्याने नुकसान झालं आहे.  परभणी - जिंतूर महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सेलू इथं पूरस्थिती निर्माण झाली असून उपआयुक्तांनी लष्कराला मदतीसाठी पाचारण केलं आहे. ६० सैनि...

September 1, 2024 8:16 PM

views 14

गुजरातमध्ये पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना

गुजरातमधे पाऊस आणि पुरानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्यातल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना भेट देणार आहे.   यावर्षी गृह मंत्रालयानं विविध राज्यांसाठी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकांची स्थापना केली असून या पथकानं आसाम केरळ मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीचं जागेवरच मूल्यांकन करण्यासाठी त्या राज्यांकडून मदतीची ...

September 1, 2024 7:16 PM

views 12

राज्यात अनेक भागात पुन्हा पावसाचा जोर

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातल्या हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल. मध्य-महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, घाटमाथ्यावरदेखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. साधारणत: ३ सप्टेंबर ते ५ सप्टें...

August 29, 2024 1:51 PM

views 18

देशात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

दिल्लीच्या काही भागात काल रात्री मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडला असून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागराच्या उत्तर आणि लगतच्या मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून पश्चिमेकडील ओडीसाच्या दक्षिणेकडे आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावर म...

August 26, 2024 9:06 PM

views 14

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आजही विविध जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली आहे.  नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरात मुसळधार पाऊस झाला असून सुसरी धरणातून गोमाई नदीत विसर्ग सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यातल्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून तीन जण वाहून गेले आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातल्या दोन, तर अक्राणी तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या ४२ घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या केळी, पपई आणि कापसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे.  नाशिक ...

August 26, 2024 1:40 PM

views 16

पुढील तीन दिवसांत देशातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील तीन दिवसांत  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात,आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशच्या वायव्य भागात आणि  राजस्थानच्या पूर्व भागात  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आज मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच पुढील तीन दिवसांत पूर्व आणि दक्षिण राजस्थान, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमध्येही हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यात, तसंच  झारखंडमध्येही पुढील...

August 25, 2024 7:12 PM

views 21

राज्यात जोरदार पावसामुळे विविध धरणांमधून विसर्ग सुरु

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असून बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.    नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्यानं धरणातलं अतिरिक्त पाणी धावरी नदीत सोडलं जाईल, असं नवी मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. त्यामुळे धावरी आणि पाताळगंगा नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.     पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.   नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरणातून ८ ...

August 25, 2024 1:53 PM

views 15

महाराष्ट्राच्या अनेक भागात संततधार पाऊस

महाराष्ट्रात मुंबईसह अनेक भागात आज संततधार पाऊस सुरू आहे. राज्यातल्या पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.    राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.