August 19, 2025 7:29 PM August 19, 2025 7:29 PM
19
राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. शहरातल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली. बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, मुंब्रा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, तसंच वाहतुकीलाही फटका बसला. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८ नागरिकांची सुटका करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा-बारा...