September 3, 2024 3:18 PM

views 48

आंध्रप्रदेशात पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

आंध्रप्रदेशात एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या  पूरग्रस्त भागात मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद संस्था हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.    आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काल रात्री राज्यातल्या पुरस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्यावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, विजयवाडा आणि हैदराबादला जोडणाऱ्...

August 27, 2024 1:41 PM

views 28

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू आहे. काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे. राज्यात सध्या ४७१ मदत केंद्र सुरू असून त्यात सुमारे ७० हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. या पुरामुळे त्रिपुरातले रस्ते पूल यांचं नुकसान झालं असून त्रिपुरा राज्य सरकारनं हे नुकसान १ हजार ८२५ कोटी रुपये इतकं असल्याची माहिती दिली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी विविध सामाजिक आणि खासगी संस्था, डॉक्टर्स तसंच सामान्य लोकांनीही मदत कार्यासाठी देणगी दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिपुरा रा...

August 12, 2024 9:22 AM

views 36

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पुरामुळे १२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातही पावसाचा जोर सर्वदूर कायम असून, ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण बेपत्ता झाले आहेत. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. किन्नौर या आदिवासी बहुल जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, पूह ते रोरीक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचं नुकसान झालं आहे. सिमला जिल्ह्यातल्या चोपाल भागात तारापूर गावात पावसामुळे सफरचंद आणि ऑरकीड फुलांची साठवणूक केलेल्या पेटयांचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच सीमूर जिल्ह्यात यमु...

August 6, 2024 11:28 AM

views 17

आसाममधल्या गुवाहाटीमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

आसाममधल्या गुवाहाटीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यानं अचानक आलेल्या पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुवाहाटीमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या पुरामुळे गुवाहाटी महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयं, शिकवणी वर्ग आणि सर्व शैक्षणिक संस्था आज बंद राहतील.

August 6, 2024 8:47 AM

views 23

पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूरबाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे प्रस्ताव सादर करावेत; त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यात दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, तसंच...

August 4, 2024 3:07 PM

views 32

पालकमंत्री अजित पवार यांचेकडून पुणे जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि त्यामुळे या नद्यांवरच्या धरणांमधून वाढवलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमझल्या पूरपरिस्थितीचा आज आढावा घेतला. जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवायचे आणि नदीकाठच्या सखल भागांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करायचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. खडकवासला धरणातला वि...

July 12, 2024 2:47 PM

views 47

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधल्या अडीच हजार गावांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत या पुरामुळे राज्यातली ३९ हजार हेक्टरवरली पिकं नष्ट झाली आहेत.  राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बुढीदिहिंग, दिसांग आणि कुशियारा या नद्यांनी पूररेषेची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

July 5, 2024 11:39 AM

views 43

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

आसाममध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे तिथली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातल्या 29 जिल्ह्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी पूरग्रस्त मोरीगाव जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरग्रस्तांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनीही माजुली, ढेमजी आणि लखीमपुर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.  

July 3, 2024 10:01 AM

views 30

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ३८ नागरिकांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. २८ जिल्ह्यांतील ११ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून पुरामुळे मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. राज्यातील ८४ महसुली मंडळातील २ हजार २०८ गावांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं असून ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचंही नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्र, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरामुळे ७४ रस्ते, १४ बंधारे आणि ६ पुलांचे नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं १४० मदत शिबिरं आणि ३५९ पुनर्वसन केंद्र उघडली आहेत.

June 16, 2024 8:37 PM

views 57

चीनमधल्या ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर

जोरदार पावसामुळे चीनमधल्या ग्वांगशी झुआंग या स्वायत्त प्रदेशातल्या २२ नद्यांना पूर आला आहे. पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याचं ग्वांगशी झुआंगमधल्या ३० जलविज्ञान केंद्रांनी म्हटलं आहे. तर फुजिआन प्रांतात दरड कोसळल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. चीनमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर येण्याचा इशारा चीन सरकारने नागरिकांना दिला आहे.