September 19, 2025 4:05 PM

views 36

हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा काँग्रेसचा आरोप

हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे याचे पुरावे आम्ही देऊ, असं त्यांनी सांगितलं. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

September 17, 2025 8:58 PM

views 29

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात अतिवृष्टीमुळे शेतातलं पीक देखील हातातून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. म्हणून  राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

August 11, 2025 1:29 PM

views 13

काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. हातून सत्ता गेल्यामुळे अराजक माजवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. घुसखोरांना मतदार घोषित करुन काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे, असं ते म्हणाले.

July 5, 2025 7:22 PM

views 32

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक डोणगावकर यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक डोणगावकर यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येत त्यांनी राज्यात युती सरकार स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना त्यांनी नांदूर-मधमेश्वर कालव्याला चालना दिली. तसंच, नागपूर-मुंबई महामार्ग, गंगापुर-भेंडाळा रस्ता आणि घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना यांसारख्या प्रकल्पांना वेग दिला.

June 17, 2025 3:36 PM

views 37

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप

जनगणना प्रक्रियेविषयी काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं की, सरकारनं जनगणना करण्याची घोषणा केली असून सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना होईल, असं स्पष्ट केलं आहे.   केंद्र सरकारनं काल जनगणनेची अधिसूचना जारी केली, त्यात जातनिहाय जनगणना होईल, असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे. त्यावर त्रिवेदी उत्तर देत होते. जातनिहाय जनगणनेचं काम तेलंगण सरकारनं उत्कृष्टर...

June 16, 2025 3:17 PM

views 67

पुणे पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत – काँग्रेस

कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी माणगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कुंडमळा इथं पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येनं येतात हे माहीत असतानाही हा धोकादायक पूल खुला का ठेवला असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.    सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडल्यावरून सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. महायुती सरकारने महापुरुषांच्या पुत...

June 8, 2025 7:02 PM

views 151

राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं, की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरं दिली पाहिजेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात लेख लिहून जनतेची दिशाभूल केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि किरण कुलकर्णी यांची ...

May 25, 2025 3:32 PM

views 66

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांचा राजीनामा

नांदेड जिल्ह्यातले काँग्रेस नेते बी. आर. कदम यांनी जिल्हाध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवला आहे. भाजपा नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्याच्या एक दिवस अगोदरच ही राजकीय घडामोडी जिल्ह्यात घडली आहे. चार दिवसांपूर्वीच कदम यांची माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. बी. आर.कदम यांनी पक्षात सुमारे ४० वर्षं काम केलं होतं. 

May 24, 2025 7:53 PM

views 13

राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

झारखंडमधल्या चाईबासा इथल्या न्यायालयानं २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राहुल गांधी यांनी २६ जूनला कोर्टात स्वतः हजर राहावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहे. २०१८ मध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सुनावणीला वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळावी अशी विनंती राहुल गांधी यांच्या वकिलांनी क...

May 15, 2025 7:40 PM

views 18

जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, म्हणून सरकारनं जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा आणि कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकाची लोकसंख्या समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात यामुळे मदत होईल. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या २७ वरून वाढून ६४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते, असं ते म्हणाले.    कर्नल सोफिया या...