September 5, 2024 7:06 PM September 5, 2024 7:06 PM

views 10

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या १०९ शिक्षकांचा गौरव

विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखवण्यात शिक्षकांचं समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचं असून त्यांच्यात जग बदलण्याची ताकद आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार विजेत्या शिक्षकांना आज मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये प्राथमिक विभागातले ३८ शिक्षक, माध्यमिक विभागातले ३९ शिक्षक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे...

September 5, 2024 7:54 PM September 5, 2024 7:54 PM

views 11

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १२१ % पाऊस, १०२ % क्षेत्रावर पेरण्या पूर्ण

यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला आहे. तसंच राज्यात १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात २०१८ नंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असल्याची माहिती आज मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख लाभार्थ्यांना ४ हजार ७८७ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं. या योजनेमुळं अन्य योजना बंद होणार नाहीत. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबिया...

September 5, 2024 6:54 PM September 5, 2024 6:54 PM

views 8

मुंबईत तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन

तालुकास्तरावरच्या ३०४ कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन आज मुंबईत झालं. या सेतु केंद्राद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपाचे अर्ज तसंच मूळ कागदपत्रं सादर करता येतील. त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीही हे केंद्र मदत करणार आहे. मंडळानं आतापर्यंत जिल्हास्तरावर ४२ कामगार सुविधा केंद्रं स्थापन केली आहेत. आता ३५८ तालुक्यांमधे ही कामगार सुविधा केंद्र सुरु होत आहेत.

September 5, 2024 3:46 PM September 5, 2024 3:46 PM

views 6

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस – मुख्यमंत्री

शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आयोजित क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. खडू आणि छडीच्या जोरावर आयुष्याची शिडी चढायला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना मुख्यमंत्र्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशात जीडीपीचं योगदान, प्रगतीचं केंद्र, परदेशी गुंतवणूक, स्वच्छता, उद्योग या सगळ्यात आपलं राज्य सर्वप्रथम आहे. आपलं राज्य शैक्षणिक द...

September 5, 2024 9:27 AM September 5, 2024 9:27 AM

views 10

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, संप मागे

राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल एसटी कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणाऱ्या विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, या निर्णयानंतर, एसटी कर्मचारी कृती संघटनेने आपला संप मागे घेतल्याचं, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे....

September 4, 2024 7:28 PM September 4, 2024 7:28 PM

views 8

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

लातूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी आज पाहणी केली. उदगीर तालुक्यात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला.   पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं असून योग्य ती मदत दिली जाईल असं यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं.केंद्रीय रा...

September 3, 2024 6:45 PM September 3, 2024 6:45 PM

views 3

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ई-गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक असून तो सरकारला अधिक जबाबदार, सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रित बनण्यासाठी सहायक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या २७व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. ‘विकसित भारत-सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ ही या परिषदेची संकल्पना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.    ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती ब...

September 1, 2024 3:06 PM September 1, 2024 3:06 PM

views 10

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं.

August 30, 2024 7:09 PM August 30, 2024 7:09 PM

views 5

प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या बंदराची निर्मिती करताना सर्वांचं हित ध्यानात ठेवू, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल, असं केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं.    वाढवण बंदरामुळे आर्थिक क्षेत्रात मुंबईचं आघाडीचं स्थान कायम राहील, यामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील, असं उपमुख...

August 29, 2024 8:19 PM August 29, 2024 8:19 PM

views 18

‘महाराष्ट्र’ जीडीपीत सर्वाधिक वाटा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचा जीडीपीतला वाटा सर्वाधिक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. आपलं सरकार रात्रंदिवस काम करत असून घरात बसून सरकार चालवता नाही येत, त्यासाठी जनतेशी संपर्कात राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले. राज्याची एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपलं सरकार उपाययोजना करतं असल्याचं त्यांनी नमूद केलं.