June 10, 2025 3:14 PM June 10, 2025 3:14 PM

views 15

पिंपरी चिंचवड ठरली भांडवली बाजारातून निधी उभारणारी देशातली पहिली महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडवली बाजारातून निधी देशातली पहिली महानगरपालिका ठरल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हरित कर्जरोखे लिस्टिंग कार्यक्रम मुंबई इथं मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात आज झाला तेव्हा ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कर्जरोखे जारी झाल्यानंतर काही मिनिटातच शंभर कोटींची गुंतवणूक झाली. यावरून हरित कर्जरोख्यांवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास दिसतो, असं फडणवीस म्हण...

June 8, 2025 7:02 PM June 8, 2025 7:02 PM

views 11

२०३०पर्यंत ५२ टक्के वीज, अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल – मुख्यमंत्री

अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने उत्तम काम केलं असून २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के वीज अपारंपरिक स्रोतातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातल्या औंध इथं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ही इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे, ऊर्जा बचत करणारी आणि गरज असेल तेवढी ऊर्जा निर्माण करणारी आहे, असं मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.   गेल्या दोन वर्षांत...

June 8, 2025 6:51 PM June 8, 2025 6:51 PM

views 6

प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरचा ताण कमी होत असल्यामुळे, संपूर्ण राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचं जाळं निर्माण करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात आंबी-तरंगवाडी इथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते.  त्यादृष्टीनं राज्यातल्या आरोग्य सेवेची पुर्नरचना करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, असं त्यांनी  नमूद केलं. 

June 5, 2025 6:44 PM June 5, 2025 6:44 PM

views 26

समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.   राज्यातले २४ जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाने राज्याचं एकीकरण केलं. लवकरच हा महामार्ग नव्याने तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल, यामुळे बंदर-केंद्रित व...

June 3, 2025 7:39 PM June 3, 2025 7:39 PM

views 21

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य – मुख्यमंत्री

राज्यातल्या ३० लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण लाभार्थी मेळावा आज पुण्यामध्ये झाला त्यावेळी ते बोलत होते. या घरांसाठी ८० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद केंद्र सरकारने केली असून राज्य सरकारतर्फे प्रत्येक लाभार्थ्याला ५० हजार रुपयांचं अनुदान देणार असल्याचं ते पुढे म्हणाले. यावेळी केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री...

May 23, 2025 3:21 PM May 23, 2025 3:21 PM

views 823

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल – मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. कोल्हापूर विमानतळावर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.    पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की या प्रकरणी दोन संशयितांना  पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी मोक्का लावण्याकरिता नियम पहावे लागतील, मात्र कायद्यातून कोणीही सुटणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.    इचलकरंजी विधानसभा मतदारसं...

May 14, 2025 7:30 PM May 14, 2025 7:30 PM

views 15

ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपाने तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यात सहभागी झाले होते. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पहलगाममधे दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे नागरिकांची हत्या केली. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत  करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असं मुख्यमंंत्र्यांनी सांगितलं.   पाकिस...

May 12, 2025 6:30 PM May 12, 2025 6:30 PM

views 8

सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

सहकार कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. ते मुंबईत, सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. सहकार चळवळीचं सिंहावलोकन करुन त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक प्रगतिशील करण्यासाठी आणि सामान्य शेतकऱ्यालाही यात जोडून घेण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.    राज्य सरकारनं  केंद्र सरकारच्या सहाय्यानं राज्यात स्मार्ट आणि ऍग्री बिझनेस प्रकल्प सुरु केले असून दहा हज...

May 11, 2025 3:33 PM May 11, 2025 3:33 PM

views 10

राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथे राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजन केलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याहीपेक्षा भव्यतेने उभा राहिला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सोहळ्यानंतर दिली.   कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या विविध वादळांच...

May 10, 2025 8:06 PM May 10, 2025 8:06 PM

views 18

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची २८वी बैठक आज मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथं पार पडली. तापी खोरे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर दोन्ही राज्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित होते. तापी मेगा रिचार्ज जगातलं एक आश्चर्य आहे. या परियोजनेमुळे महाराष्ट्राची दोन लाख ३० हजार हेक्टर आणि मध्य प्रदेशची सुमारे एक लाख ३१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असं मुख्य...