July 4, 2025 6:25 PM July 4, 2025 6:25 PM

views 9

भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं-मुख्यमंत्री

महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही. पण, भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.    पहिलीपासून हिंदीसक्तीचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळात झाला होता. आता त्याविरोधात विजयी मेळावा घेणं हा दुटप्पीपणा आहे. आपण या संदर्भात समिती स्थापन केली आहे. मराठी भाषक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आपलं सरकार घेईल, असंही फडणवीस यावेळी...

July 2, 2025 8:27 PM July 2, 2025 8:27 PM

views 13

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर 'मकोका' अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. असे गुन्हेगार एका राज्यात अटक होऊन जमीन मिळाल्यानंतर दुसऱ्या राज्यात जाऊन तिथे गुन्हे करतात, हे टाळण्यासाठी सर्व राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा गुन...

July 2, 2025 1:48 PM July 2, 2025 1:48 PM

views 12

महाराष्ट्रात वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य वाढवून देण्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांचं आश्वासन

वीज कोसळून मृत्यू झालेले शेतकरी शेतमजूर यांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या कक्षेत वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता, आता तो करण्यात आला आहे, असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मदत निधी वाढवून देण्याबाबत सूचनांचा विचार करून, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन महाजन यांनी दिलं. राज्यातल्या विविध विकास कामांमधे मेघा इंजिनियरिंग या कंपनीनं ३ हजार कोटींचा भ्...

June 29, 2025 8:45 PM June 29, 2025 8:45 PM

views 20

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ, ...

June 29, 2025 7:30 PM June 29, 2025 7:30 PM

views 30

त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

शालेय शिक्षणात तिसरी भाषा कधीपासून शिकवावी, ती कोणती असावी, कशी शिकवली जावी, यासंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं. विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आणि सरकारला एक पत्रही दिलं. मात्र विरोधकांकडे कोणतेही नवे मु...

June 27, 2025 9:52 AM June 27, 2025 9:52 AM

views 14

शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

एक महामार्ग अर्थव्यवस्थेची अनेक दालनं उघडी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केलं आहे. शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महामार्गाच्या प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर पाचशे ते एक हजार शेततळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

June 24, 2025 8:06 PM June 24, 2025 8:06 PM

views 56

राज्यात १ हजार ७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री

राज्यात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १ हजार ७१ मेगावॅट क्षमतेचे सौरउर्जा प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०’ अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. या प्रकल्पांमुळे राज्यातल्या ३ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ५ दशांश मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५ ते १० किलोमीटर परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे सौर ऊर्जा  प...

June 20, 2025 6:44 PM June 20, 2025 6:44 PM

views 8

आदिवासी गावांमध्ये १७  योजनांची अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री फडणवीस

‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी गावांमध्ये १७  योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. जळगाव जिल्ह्यात धरणगावात उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचं उद्घाटन आणि जामनेर तालुक्यात गोद्री फत्तेपूर इथं गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आज झालं. त्यावेळी ते बोलत होते.   धरणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्ण...

June 17, 2025 6:45 PM June 17, 2025 6:45 PM

views 9

विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री फडनवीस यांना निमंत्रण

यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं मुंबईत त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिलं आहे. येत्या ६ जुलै रोजी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री फडनवीस सपत्निक, तसंच मानाच्या वारकरी जोडप्यासह विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करतील. 

June 10, 2025 3:09 PM June 10, 2025 3:09 PM

views 11

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार – मुख्यमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार गतीशील आणि निर्णयक्षम सरकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी सरकारने देशातला भ्रष्टाचार संपवत विकास आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे सरकार चालवलं असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एका वर्षात ३० लाख घरं देण्याचा विक्रम केला, ८१ कोट...