March 6, 2025 8:24 PM March 6, 2025 8:24 PM

views 14

येत्या ३ महिन्यात राज्याचं अंतराळ धोरण तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

येत्या ३ महिन्यात राज्य सरकार अंतराळ धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं. ठाणे जिल्ह्यात उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं आय़ोजित स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नेंस कॉन्क्लेव्ह मध्ये ते बोलत होते.      गेल्या काही वर्षांत, अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लवकरच हे तंत्रज्ञान सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले. अंतराळ धोरणामुळे काही वर्षांची कामे काही दिवसांत केली जातात. त्यामुळे योग्य धोरणे आखली तर ...

March 2, 2025 8:17 PM March 2, 2025 8:17 PM

views 8

विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. आपल्याकडे एखादी बातमी आली तरी दुसऱ्याबाजू सहित ती बातमी प्रकाशित करावी, असी विनंतीही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी माध्यमांना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत असून त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांविरोधात निश्चित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी द...

February 24, 2025 8:51 PM February 24, 2025 8:51 PM

views 16

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आणखी ३ हजार रुपये देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत राज्य शासनातर्फे ३ हजारांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत मिळणारे ६ हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो कृषी सन्मान योजनेचे ६ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. त्यात आता राज्य शासनाकडून ३ हजार रुपयांची वाढ करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच १५ हजार रुपये जमा होतील. या योजनेच्या माध्यमातून छोटे शेतकरी तसंच शेतीउत्पादक गटा...

February 19, 2025 8:40 PM February 19, 2025 8:40 PM

views 20

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना लवकरच युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले आहेत, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्ताने पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदयात्रेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवरायांची जयंती फक्त भारतातच नाही तर २० देशांमध्ये साजरी केली जाते. त्यांचं प्रशासन, कल्याणकारी धोरणं, संरक्षण आणि नौदलाचं व्यवस्थापन, दूरदर्शी नेतृत्व हे अतुल...

February 13, 2025 8:26 PM February 13, 2025 8:26 PM

views 11

जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान-मुख्यमंत्री

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेलं जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान असून लोकसहभागातून झालेली कामं जलक्रांतीच्या दिशेनं पडलेलं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत ६०१ नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं ऑनलाईन पध्दतीनं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. प्रातिनिधीक स्वरुपात ६ उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती पत्रांचं वितरण मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या समारंभात करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस...

February 9, 2025 7:52 PM February 9, 2025 7:52 PM

views 8

डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे शेकडो कोटी रुपयांची बचत – मुख्यमंत्री

राज्यानं तयार केलेल्या डायनामीक सायबर प्लॅटफॉर्ममुळे अल्पावधीतच शेकडो कोटी रुपयांची बचत झाली असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूर इथं सायबर हॅक कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. या समर्पित व्यासपीठानं सायबर धोक्याचा मागोवा घ्यायला सुरुवात केली असून इतर राज्य या प्रणालीचं अनुकरण करायला उत्सुक असल्याचं ते म्हणाले. 

February 9, 2025 7:36 PM February 9, 2025 7:36 PM

views 11

आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाबा आमटे यांनी सुरु केलेल्या आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. वरोरा इथं आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे. आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हेे साध्य करता येईल असं ते म्हणाले.  आनंदवनात पाचशेजणांसाठी निवासी रुग्णकेंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शासकीय अनुदानाच्या...

February 7, 2025 7:24 PM February 7, 2025 7:24 PM

views 9

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात, गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री फडनवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ औद्योगिक महोत्सवाचं’ उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या 'पोलाद क्रांती'चा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ५ वर्षांत गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल, असा ...

February 5, 2025 8:18 PM February 5, 2025 8:18 PM

views 14

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्...

February 3, 2025 8:43 PM February 3, 2025 8:43 PM

views 14

जलसंधारणाच्या जुन्या प्रकल्पांच्या दुरुस्ती, देखभालीकरिता नवीन धोरण आणणार

जलसंधारणाच्या जुन्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती आणि  देखभालीकरिता राज्य शासन नवीन धोरण आणणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही माहिती दिली.  मृद व जल संधारण विभाग आणि विविध संस्था- संघटना यांच्यामध्ये आज तीन सामंजस्य करार करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते. आजवर रखडलेले प्रकल्प नवीन धोरणामुळे प्राधान्यानं पूर्ण होतील, तसंच कमी खर्चात अधिक काम पूर्ण होऊन  जलसंधारणाचा प्रभावी वापर होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.    नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारती...