October 26, 2025 3:16 PM October 26, 2025 3:16 PM

views 53

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फलटण इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण

नीरा देवधर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासह फलटण इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं. या प्रकल्पामुळे फलटण आणि माळशिरसला पाणी मिळणार असून हरित माणदेश निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, असं प्रतिपादन फडनवीस यांनी यावेळी केलं. माळशिरस तालुक्यातल्या बावीस गावांना पाणी पोहोचवलं जाईल, दुष्काळी भागाला पाणी पोहोचवणं हे सरकारचं ध्येय आहे, असं त्यांनी सांगितलं. विरोधकांच्या कार्यकाळात या प्रकल्पाचं काम अडवण्यात आलं होतं, त्यामु...

October 26, 2025 8:41 AM October 26, 2025 8:41 AM

views 170

रिध्दपूर इथं जागतिक कीर्तीचं मराठी भाषा विद्यापीठ उभारणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

'सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्याबरोबर समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची आहे', असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38 व्या अधिवेशनात ते काल बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. रिद्धपूर या तीर्थक्...

October 25, 2025 8:06 PM October 25, 2025 8:06 PM

views 22

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची  विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची-मुख्यमंत्री

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची  विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची असून सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच त्यांनी समाजात समतेचा विचार रुजवला, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नाशिक इथं आज  अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या  अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, अेाझर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं  स्वागत करताना श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्य...

October 20, 2025 7:43 PM October 20, 2025 7:43 PM

views 54

विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विकसित महाराष्ट्र २०४७ सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला मान्यता दिली गेली. आता हा मसुदा मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.  या मसुद्याअंतर्गत २०२९, २०३५ आणि २०४७ पर्यंत अशा तीन टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्यासाठीचा मार्गदर्शक आराखडा मांडला आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७  विकसित भारताचा मांडलेला संकल्प साकार करण्यासाठी हा मसुदा उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावे...

October 11, 2025 7:03 PM October 11, 2025 7:03 PM

views 28

राज्य शासनाचं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू- मुख्यमंत्री

राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता स्विकारण्याचं धोरण सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वांद्रे इथं मेहबुब स्टुडिओत एचपी आणि इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एचपी ड्रीम अनलॉक्ड’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयाच्या कल्पनांना आकार देऊ शकते असं ते म्हणाले. आजचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. शासनानं एचपी सोबत डिजिट...

September 21, 2025 9:15 AM September 21, 2025 9:15 AM

views 30

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो – मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीतून देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. इंडियन पोलीस फाऊंडेशनच्या १०व्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत भारताच्या आर्थिक विकासासाठी पोलीस दलाची पुनर्कल्पना या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते.

September 13, 2025 2:58 PM September 13, 2025 2:58 PM

views 25

अनुकंपा तत्त्वावरच्या १५ वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लौकरच करणार-मुख्यमंत्री

अनुकंपा तत्त्वावरच्या १५ वर्षांपासून रखडलेल्या नेमणुका लौकरच करणार  असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.   मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ इथं आज आदी कर्मयोगी अभियान आणि जिल्ह्यातील २८९ कोटींच्या प्रकल्पाचं लोकार्पण तसंच लाभ वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते, यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसंच मंत्री संजय राठोड उपस्थित होते.   अनुकंपा तत्वावरील एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावे...

September 11, 2025 3:27 PM September 11, 2025 3:27 PM

views 22

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातलं सर्वोत्तम राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातलं सर्वोत्तम राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जियो वल्ड ट्रेड सेंटर इथं इंडिया-ऑस्ट्रेलिया मंचाच्या गोलमेज परिषदेत बोलत होते.   गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर असून, विविध क्षेत्रांविषयी नवीन आणि परिपूर्ण धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणं जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राची समावेश आहे. व्यापार सुलभतेत नव्यानं सुधारण...

September 8, 2025 8:34 PM September 8, 2025 8:34 PM

views 19

भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल-मुख्यमंत्री

व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वं आहेत, या व्हिजन नुसार भविष्यातली राज्याची धोरणं आखून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत बोलत  होते.  आपण योग्य मार्गावर आहोत. पुढच्या वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे. केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य व्हावं, यासाठी आपली संपूर्ण क्षमता...

August 29, 2025 11:22 AM August 29, 2025 11:22 AM

views 8

मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय न करता दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

मराठा किंवा ओबीसी दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, दोन्ही समाजाचे प्रश्न शासन सोडवेल, या पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. कोणत्याही समाजाचे हक्क काढून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाहीत, दोघांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असं फडनवीस म्हणाले.    दहा टक्के आरक्षण दिल्यावरही मराठा समाजाच्या आंदोलनाचं कारण कळलेलं नाही. लोकशाहीच्या चौकटीत या मागणीवर काय तोडगा काढता येईल ते पाहू. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला कितपत फायदा मिळेल याबाबत शंका आहे, त्यामुळे...