March 24, 2025 11:09 AM March 24, 2025 11:09 AM

अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप

अहिल्यानगर इथं काल १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. राज्य शासन वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून, संत साहित्य संमेलनासाठी दरवर्षी १५ लाख रुपयांचं अर्थासहाय्य दिलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केल्याबद्दल वारकरी विठ्ठल पुरस्कार या कार्यक्रमात सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.