February 22, 2025 8:14 PM

views 29

शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा -शिवराज सिंह चौहान

‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पुसा-कृषी विज्ञान मेळ्याचं उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आणि शेतीशिवाय, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच सरकार कृषी क्षेत्रात सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.   दरम्यान शिवराज चौहान यांनी हरियाणात गुरुकुल कुरुक्षेत्र इथल्या नैसर्गिक पद्धतीनं केलेल्या शेतीचीही पाहणी केल...

February 18, 2025 7:50 PM

views 22

शहरी भागातल्या भूखंडांचं सर्वेक्षण करण्यासाठीच्या नक्षा पथदर्शी प्रकल्पाला सुरुवात

देशातल्या प्रत्येक घटकाच्या हितरक्षणासाठी केंद्रसरकार काम करत असून त्यामुळे देशवासियांच्या जीवनात मोठा बदल झाला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. नक्शा, अर्थात नॅशनल जिओस्पेशिअल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स च्या पथदर्शी कार्यक्रमाचं उद्घाटन मध्य प्रदेशात रायसेन इथं केल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते.    या मोहिमेत देशातली २६ राज्यं आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण १५२ नगरपरिषदांच्या हद्दीतल्या भूखंडांचं सर्वेक्षण केल...

January 3, 2025 9:59 AM

views 59

शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं प्रतिपादन

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचं उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल अहिल्यानगर जिल्हयामध्ये केलं. राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात चौहान बोलत होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी मंत्रालयानं सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा चौहान यांनी घेतला तसंच कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. लखपती दीदी आ...

November 19, 2024 8:30 PM

views 16

शाश्वत आणि किफायतशीर शेतीसाठी सरकार वचनबद्ध-शिवराजसिंग चौहान

शाश्वत आणि किफायतशीर शेती, लवचिक पर्यावरण आणि  सर्वांसाठी अन्नसुरक्षा  उपक्रम  राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी  केलं.  नवी दिल्ली इथं आज  जागतिक मृदा परिषदेमध्ये बोलत असताना चौहान यांनी  मृदेच्या खालावलेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली. ही एक  जागतिक  समस्या असून रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे सुमारे ३० टक्के मृदा निकृष्ट बनली आहे आणि म्हणूनच सरकार सेंद्रिय शेतीला, शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाला  प्रोत्साहन देत आहे  असंही ते...

September 5, 2024 12:58 PM

views 24

राज्याला केंद्रिय कृषी मंत्रालयाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच 2022-23 या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत झालेल्या समारंभात केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर वार्षिक 3 टक्के सवलत दिली जाते. या योजनेसाठी राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत विविध बँकांनी 8 हजार 353...

September 3, 2024 9:44 AM

views 25

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज कृषी निवेश पोर्टलचा प्रारंभ करणार

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नवी दिल्लीत अ‍ॅग्रीशुअर फंड आणि कृषीनिवेश पोर्टलचा प्रारंभ करणार आहेत. याशिवाय विविध विभागात कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांच्या प्रयत्नांचं कौतुक म्हणून दिल्या जाणाऱ्या कृषी पायाभूत निधी अर्थात एआयएफ उत्कृष्टता पुरस्कारांचं वितरणही कृषीमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. राज्यांचे मंत्री तसंच विविध राज्याचे आणि बँकाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कारांमुळे बँकांना त्यांची कामगिरी आणखी सुधारण्यास आणि...