एक महामार्ग अर्थव्यवस्थेची अनेक दालनं उघडी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केलं आहे. शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महामार्गाच्या प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर पाचशे ते एक हजार शेततळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.