मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची काँग्रेसची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे झालं असं नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ का केलं नाही हा प्रश्न आहे, असं सपकाळ म्हणाले. सरकार मुंडेंना वाचवायचा प्रयत्न करत होतं असा आरोप सपकाळ यांनी केला.