रायगड जिल्हात उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला स्थानिक आणि भूमीपूत्र तीव्र विरोध करत आहेत. या योजने अंतर्गत धेरंड – शहापूर परिसरात सुमारे ३८७ हेक्टर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या सिनारमास कंपनीच्या प्रकल्पाचं सीमांकन आणि तिथवर जाणाऱ्या रस्त्याच्या भराव कामाला सुरुवात झाली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज जोरदार निदर्शनं केली. आधी आपल्या मागण्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Site Admin | November 17, 2025 6:22 PM | Mumbai | Raigad
रायगडमध्ये उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला भूमीपुत्रांचा विरोध