November 3, 2025 7:41 PM | India Post Office

printer

टपाल विभागाच्या विशेष जनसंपर्क अभियानाचा समारोप

दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागानं गेल्या महिन्याच्या २ ते ३१ तारखेपर्यंत आयोजित केलेल्या विशेष मोहीमेच्या अखेरच्या टप्प्याचा समारोप केला. या मोहिमेअंतर्गत, दूरसंचार मंत्रालयानं २३ हजार चौरस फूट पेक्षा जास्त कार्यालयीन जागा, भंगार आणि टाकाऊ साहित्याच्या विक्रीतून ५७ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं. 

 

या मोहिमेत शाश्वत स्वच्छता, विदा व्यवस्थापन, प्रलंबित प्रकरणांची वेळेवर विल्हेवाट लावणं आणि जागेचा जास्तीत जास्त वापर, यावर भर देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत, मंत्रालयाने एक लाख सार्वजनिक तक्रारी निकालात काढल्या.