डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुढल्या संकटाचा सामना करण्यासाठी गौतम बुद्धांची शिकवण हाच उपाय- प्रधानमंत्री

संपूर्ण जग आज पर्यावरणापुढल्या संकटाचा सामना करत असून भगवान गौतम बुद्धांची शिकवण हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. थायलंड इथं आयोजित संवाद कार्यक्रमाला त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं.

 

भगवान बुद्ध यांचा संयमाचा विचार जागतिक आव्हानाला सामोरं जाताना आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतो, असं ते यावेळी म्हणाले. पर्यावरण विषयक संकटामुळे पृथ्वीला धोका उत्पन्न झाला आहे, आपण निसर्गापासून वेगळे नाहीत, असं हिंदू आणि बौद्ध धर्माचा विचार आपल्याला शिकवतो असं ते म्हणाले.