डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची इंडिया आघाडीची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची मागणी इंडिया आघाडीने केली आहे. नवी दिल्ली इथं इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इंडिया आघाडीच्या सोळा घटक पक्षांनी संसदेचं विशेष सत्र बोलावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहिती काँग्रेस खासदार दीपेंदर सिंह हुड्डा यानी बातमीदारांना दिली. 

 

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सर्व विरोधी पक्ष संरक्षण दल आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे होते, असं हुड्डा म्हणाले. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केेलेल्या वक्तव्यांमुळे भारताच्या भावना दुखावल्याचं राजदचे खासदार मनोज झा यांनी म्हटलं आहे. हा सरकार किंवा विरोधकांचा प्रश्न नाही तर जबाबदारीचा प्रश्न आहे, त्यामुळे विशेष सत्र बोलावणं गरजेचं आहे, असं झा म्हणाले.