डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताची पाकिस्तानकडून आयात बंद

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारतानं पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरकारची वेगळी परवानगी घ्यावी लागेल असं अधिसूचनेत म्हटलं आहे.