डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलं सतर्क, हल्लेखोरांचा शोध जारी

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. हा मदत कक्ष चोवीस तास सुरू राहणार असून पर्यटक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ०२२-२२०२७९९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन राज्य शासनाने केलं आहे. 

 

श्रीनगर जिल्हा प्रशासनानेही पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा यासाठी मदत कक्ष स्थापन केला असून ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४६३६५१, ०१९४-२४५७५४३ या क्रमाकांवर संपर्क करायचं आवाहन केलं आहे. तसंच, ७००६०५८६२३, ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७ या क्रमांकांवर व्हॉट्सॲप संदेश पाठवण्याचं आवाहनही शासनाने केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा