पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.  अशा प्रकारची न्यायालयीन चौकशी सैन्यदलाचं धैर्य खच्ची करु शकेल असं कारण न्यायालयानं दिलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता ही याचिका करणं चुकीचं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.