पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष गाडी आज रात्री सोडणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कटरा ते दिल्ली विशेष गाडी आज रात्री सोडणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेने विशेष हेल्पलाईन क्रमांक जम्मू – तावी, श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि उधमपूर या स्थानकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

श्रीनगर हून दिल्ली आणि मुंबई करता मिळून ४ विशेष विमानं सोडण्यात आली, आणि प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी विमानसेवा उपलब्ध करुन दिल्या जातील असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं आहे.