महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकांमध्ये ६८ ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्ज माघारीची न्यायालयीन चौकशी करावी असं मनसेनं या याचिकेत म्हटलं आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
Site Admin | January 5, 2026 8:15 PM | #Election2026 #MunicipalCouncilElection #MaharashtraElection2026 #Maharashtra | MNS
महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेची न्यायालयात धाव