महाराष्ट्राच्या विविध भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस काल दक्षिण कोकणात दाखल झाला असून, तो यावर्षी नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच राज्यात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आगामी दोन दिवस पावसाचे असले तरी 27 मे पासून पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होईल; मे महिन्याच्या शेवटी कोकण वगळता बहुतांश भागात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाची अपेक्षा करून शेतकऱ्यांनी कोरडवाहू जमिनीवर पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.